Tuesday, 5 May 2020

र्गुरुर्देवो महेश्वरः

प्रत्येक जण शाळे मध्ये असताना हा गुरु मंत्र म्हणत असतो पाठही  असतो आणि जस जस मोठं होतो तस तस याचा आपणाला विसर पडतो. कारण सर्व जण शाळा सोडल्यानंतर पुढे कॉलेज , नोकरी , व्यवसाय, घर आणि संसार यामध्ये व्यस्त होऊन जातो . मग या मंत्रांची आपल्याला गुरु पौर्णिमा आणि शिक्षक दिन म्हणजे वर्षातून दोन वेळा  लोकांनी व्हाट्सअप वर ठेवलेले स्टेटस पाहून पुन्हा आठवण येते . काय बरोबर आहे ना ?
 ५ सप्टेंबर या  दिवशी साजरा होणारा शिक्षक दिन यावरून आज मला काही वास्तव तुम्हाला सांगायचं आहे  जे मी माझ्या जीवन प्रवासात अनुभवलेलं आहे. 

शिक्षक म्हणल  कि आपल्याला गणिताचे,मराठीचे, विज्ञानाचे, इतिहास-भूगोलाचे शिक्षक आठवतात. त्यासोबत त्यांनी मारलेल्या छडया आणि दिलेला चोप सुद्धा अजून आठवतो. खरंच शिक्षकांना किती घाबरायचो आपण ? काही शिक्षक कडक स्वभावायचे म्हणजे शिस्त-प्रिय आणि काही शिक्षक मृदू स्वभावाचे म्हणजे हसत खेळत शिकवणारे . त्यामुळे शिक्षकांचं महत्त्व कायम माझ्या मनात वेगळं होत. तुम्हाला आठवत ! प्रत्येक जण शाळेत असताना तुम्हाला नेहमी १ प्रश्न विचारला जायचा, तुम्ही मोठे झाल्यावर कोण बनणार ? शाळेत असतानां बाहेरील जगाचा अनुभव नसतो आणि आपण उत्तरे देतो ,मी डॉक्टर बनणार, इंजिनिअर बनणार, वकील बनणार, संशोधक बनणार etc . आता मला इतकं हसू येत हे आठवलं कि कारण माझ्या वर्गातील सर्वच जण असच उत्तरे द्यायची.

आमचा मराठीचा तास चालू होता आणि मराठीचे शिक्षक आम्हाला यशवंतराव चव्हाणांचा  धडा शिकवत असताना १ वाक्य आलं मी मोठेपणी यशवंतराव चव्हाणच बनणार . त्या नंतर आमच्या शिक्षकांनी मधेच शिकवणं बंद केलं आणि प्रश्न विचारला, मुलांनो ! तुम्ही मोठे झाल्यावर कोण बनणार ? एक एका विद्यार्थ्याने उभे राहून सांगायचं असल्यामुळे वर्गात चुळबुळ चालू झाली. आम्ही ५-६ जणी बेंच जोडून सलग बसणाऱ्या ग्रुपचं एकच काम चालू झालं . कोण काय सांगत आहे ऐकायचं आणि तो हुशार असेल तर ठीक! पण अभ्यासात ढ असेल, तर त्याच ऐकायचं आणि डॉक्टर, वकील,  इंजिनीअर म्हणालं  कि जोरात हसायचं . आपली मैत्रिण काय सांगत आहे हे ऐकायचं आणि हसायचं असा उद्योग चालू होता माझा. बघता बघता माझ्यावर नंबर आला मी उठून उभा राहिले आणि पटकन काही सुचेना म्हणून मीही इंजिनीअर बनणार असं बोलले. तेंव्हा आमचे शिक्षक असं म्हणाले होते कि शिक्षक कोणालाच बनायचं नाही का? याची मला खूप खंत वाटत आहे आणि दुर्दैव हि !!! आज या घटनेला बरीच वर्षे उलटून गेली आहेत पण माझ्या शिक्षकांचे ते वाक्य अजूनही जसेच्या तसे माझ्या कानावर पडत असल्याचा भास होतो.  

मी आज खरोखरच इंजिनीअर आहे याचा मला अभिमान आहे पण त्याहून जास्त अभिमान अजून एका गोष्टीचा वाटतो कि मी शिक्षिका देखील आहे. कदाचित सर असते तर त्यांची हि खंत दूर झाली असती. असो!
 शिक्षक या घटकाकडे  बघण्याचा दृष्टिकोन सर्वांचा वेगळाच आहे. 

काही लोकांच्या म्हणण्यानुसार... 
शिक्षकांना काय काम असतात ? अहो सावलीला बसून पगार असतो त्यांना !
 मुलांन  समोर जाऊन काही तरी १ तास बडबडून यायचं ! दिवसातून २-३ तास शिकवलं कि झालं हो नंतर दिवस रिकामा बसून काढायचा ! मुलांना काय कळतंय ? काही कीर्तनकार तर शिक्षकांनवर बेधडक विनोद करतात. 

काही लोक म्हणतात शिक्षक म्हणजे जीवनाचा शिल्पकार असतो. शिक्षक नेहमी तुमच्या चांगल्या गोष्टीं साठीच शिकवत असतात. शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचे तुम्ही मूल्य करू शकत नाही.

दोन्हो लोकांची मते तपासून पहिली तर तशी दोन्ही बरोबरच आहेत !!

हो!! शिक्षक जीवनाचा शिल्पकार तेंव्हा होता जेंव्हा शिक्षणाचा बाजार झाला नव्हता . तो तुम्हाला विना मूल्य भरगोस ज्ञान वाटत असे जेंव्हा विद्यार्थ्यांना ते खरंच  हवं असे. शिक्षक सावलीला बसून पगार घेतो आणि १-२ तास बडबड करून निघून जातो कारण आता विद्यार्थी शिक्षकांचा मान ठेवत नाहीत , त्यांना शिस्त लावण्याची सोय राहिली नाही . म्हणून विद्यार्थी झाले कस्टमर आणि शिक्षक झाले आहेत व्यवसायिक. 

शिक्षकांच्या या परिस्थीला कुठेतरी आपणच जबाबदार नाही का हो ? 
आज आपल्या मुलाला शिक्षकांनी मारलं किंवा छड्या दिल्या कि लगेच तुम्ही शिक्षकांच्या अंगावर धावून जाता. का मारलं ? का शिक्षा केली? काहीही विचारत नाही ? 

आमच्या वेळी शाळेत आगाऊपणा केला कि शिक्षक  बेदम मारायचे वरून घरी सांगायची सोय नाही घरचे सुद्धा येऊन बिनधास्त सांगायचे काही आगाऊपणा केला कि अजून मार द्या आम्ही काहीही विचारणार नाही. सुदैवाने माझ्यावर असली वेळ कधी आली नाही पण मुलांच्या बाबतीत नेहमी घडायचं. तेंव्हा असं काही गंभीर गुन्हे शिक्षकही करत नव्हते  आणि पालकांनाही जाब विचारायची वेळ यायची नाही . पण आता परिस्तिथी बदलली आहे. 

आजच्या परिस्तिथीत शिक्षक , पालक आणि विद्यार्थी तिन्ही घटक गुन्हेगार झाले आहेत. आपण अनेक बातम्या बघतो वाचत असतो त्यावरून समजतं. मला आता यावर अधिक विस्ताराने नाही बोलायचं कारण विषय फार मोठा होईल. तर माझ्या मुद्द्यावर येते.

मी इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये प्रोफेसर आहे. आता अर्थातच तुम्हाला कल्पना आली असेल कि हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं कसे असेल! इंजिनीअरिंग म्हणाल तर खूप अभ्यास असतो खूप प्रात्यक्षिके करावी लागतात आणि खूप परीक्षा हि असतात. 

माझा आज पहिलाच दिवस होता इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये शिकवायला जाण्याचा आणि अर्थात नोकरीचा. मी वर्गात गेले ,  सर्व जण गोंधळ घालत बसले होते मला पाहताच कोणी नवीन मॅडम आल्या आहेत पाहून सर्वांनी कंमेंट्स करायला सुरवात केली. मी माझे शिक्षण मोठ्या कॉलेज मधून पूर्ण केल्यामुळे मला इंजिनीअरिंग च्या   विद्यर्थ्यांना  शिकवण्याचा आत्मविश्वास होताच तसेच माझे कम्मुनिकेशन चांगले असल्यामुळे मला तो वर्ग पटकन शांत करता आला . मी पहिल्या दिवसा पासून शिकवायला सुरुवात केली होती . माझा तास संपला ,नंतर मी माझ्या केबिन मध्ये जाऊन बसले. खूप थकल्यासारखं वाटू लागलं होत.  मला वाटलं मला जमेल का ?हे मी स्वतःबरोबर बोलू  लागले.

किती मोठी मुलं  आहेत हि ? मी

मग असूदेत मी काही कमी नाही . माझ्यातील शिक्षक

ते कंमेंट्स पास करत होते कसं वाटत होत ? अक्षरशः रडू येत होत? मी

पहिलाच दिवस आहे त्यामुळे!! तू जर तुझ्या शिकवण्याच्या पद्धतीने त्यांना आकर्षित केलं तर नाही करणार ते कंमेंट्स.  माझ्यातील शिक्षक

हो पण १ तास सलग बडबड करायची खूप दम लागतो मला ? मी

होईल सवय आत्तापर्यंत बेंच वर बसून ऐकायची सवय होती आता पात्र बदललं आहे . माझ्यातील शिक्षक

मला जमेल हे ? मी

का नाही ? माझ्यातील शिक्षक

असं स्वतः सोबतच माझं संभाषण चालू असताना मे आय कम इन मॅम  ? असा आवाज येऊन मी भानावर आले .  मघाशी मी ज्या वर्गात तास घेतला होता त्या वर्गातील अक्षय नावाचा मुलगा होता . तो मला सांगायला आला होता कि मॅडम तुम्ही खूप छान शिकवत आहे. आम्हाला या आधी असं कोणीच शिकवलं नाही. मी थँक यु म्हणून तुला काही अभ्यासात शंका असेल तर विचार असं सांगून दिल .

लंच ब्रेक झाला मी माझ्या सोबत असलेल्या बाकीच्या शिक्षकानं सोबत डब्बा खायला बसले . जेवताना आमचा विषय चालू झाला . १ मॅडम म्हणाल्या मॅडम  आज पहिलाच दिवस ना ? मी  होकारार्थी मान हलवली . त्या सांगत होत्या मॅडम हि मोठी मुलं इंजिनीअरिंग आली म्हणजे त्यांना शिंगे येतात.  शिक्षक म्हणजे त्यांना काय वाटत त्यांनाच ठाऊक .तासाला बसायचं नाही , कंमेंट्स पास करायच्या, उलट उत्तरे द्यायची,  काही बोललं कि विभाग प्रमुखाकडे तक्रार द्यायची कि या मॅडम च आम्हाला शिकवलेलं समजत नाही. मग जाउद्यान कशाला आपण तरी मन लावून शिकवा. pass out झाले कि समजेल नोकरीची काय परिस्तिथी आहे .त्यांच्या बोलण्याला साथ देत दुसऱ्या मॅडम म्हणाल्या अहो आपल्या वेळी इंजिनीरिंग ची काय परिस्तिथी होती.  आपण किती अभ्यास करायचो! प्रत्येक गोष्ट यायलाच पाहिजे .हल्ली carry on ची फॅशन आली हो . नुसतं नावाला इंजिनिअर व्हायचं  . काही मुली तर चांगली स्थळ मिळण्यासाठी इंजिनिअर बनतात तर काही मुलं आई वडिलांनी घातलं म्हणूनच कॉलेजला येत आहे असे  बोलून आपल्यावरच उपकार करतात. हि मुलं बेधडक असं सांगतात शिक्षकांना याचंच आश्चर्य आहे.

त्यावर १ सर बोलले आपण आपले कर्तव्य करायचं ज्यांना शिकायचं आहे ते शिकतील. सर्वच अशी मुले नाहीत. काही जण त्यांना आयुष्यात काही तरी बनायचं आहे म्हणून येतात कॉलेजला. काही जणांची परिस्तिथी नाही अशी मुले शिष्यवृत्ती मिळवून शिकत आहेत.

मला तर वेडावल्या सारखं झालं. मी कॉलेज ला होते तेंव्हा आम्ही सुद्धा कंमेंट्स पास करायचो पण शिक्षकांना घाबरायचो देखील. शिक्षक-विद्यार्थ्यांचं नातं जपायचो. आता म्हणजे शिक्षक -विद्यार्थी खांद्यावर हात टाकून मित्र असल्या सारखे वागू लागले आहेत. असं १ का शिक्षकाने केलं तर त्याचे परिणाम स्रर्वांना भोगावे लागतात. त्यापेक्षा शिक्षक-विद्यार्थ्यांचं नातं maintain करा .
मला आता माझ्या शिक्षकाच्या अनुभव वरून १ गोष्ट चांगली समजली होती . तुम्हाला जर तुमच्या विषय मधील पूर्ण ज्ञान असेल आणि तुम्ही तुमच्या विषयासंबंधी सर्व शंकांचे निरसन व्यवस्तिथ करू शकत असाल तर मुलं तुमच्या तासाला गोंधळ घालत नाहीत किंवा कंमेंट्स पास करत नाहीत.

हे झालं शिकवण्या संबंधी पण १ पर्मनंट नसलेला शिक्षक याला त्या कॉलेजच्या राजकारणाला बळी पडाव लागत . तिथे सिनिअर -ज्युनिअर प्रकार असतो . ज्युनिअर लोकांनी सिनिअर शिक्षकांची कामे करायची . त्यात जर तुमचं कॉलेज असे  असेल तर तुमच्यावर कधी  राजकारण होऊन तुमची नोकरी जाईल याचा पत्ता लागायचा नाही. तुम्हाला सिनिअर शिक्षकानं पेक्षा जास्त विषय शिकवावे लागतात. तुम्हाला आवडेल तो विषय शिकवण्याची मुभा नसते. पगारच बोलायचं तर पर्मनंट शिक्षकाचा पगार लाखाच्या घरात आणि तोच ज्युनिअर पर्मनंट नसल्याचा हजाराच्या घरात . असो !!!!!

बहुतेक इंजिनीअरिंग ची मुलं हि मोठ्या घरची म्हणजे संपन्न कुटुंबातील असतात त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी कॉलेजला काही पैसे दान दिले असतील तर त्यांच्या मुलांच्या दादागिऱ्या शिक्षकाने सहन करायच्या. त्यांची कुवत नसताना त्यांना इंटर्नल मार्क्स जास्त द्यायचे. त्यांचे एक्सटेर्नल प्रॅक्टिकल्स सोडवायची असे प्रकार सुरु झाले आहेत.

असाच १ विद्यार्थी माझ्या वर्गात होता वर्ष भर कधीतरी तोंड दाखवायला यायचा पण त्याच्या आई-वडिलांनी कॉलेजला काही रक्कम दान दिली असल्या मुळे  माझ्या मनात नसताना त्याला पास करावं लागलं किती अन्याय आहे बाकीच्या मुलांवर हा ?
काही मुले तर इतकी उद्धट असतात कि सांगायला नको . सरळ बोलतात मॅडम चेक करता का नाही assignment नाही तर विभाग प्रमुखाला सांगतो . विभाग प्रमुख management  च्या नावाखाली त्यांच्यावरच पांघरून घालून मोकळे होतात. त्यात त्यांचा तरी काय दोष ? ऍडमिशन झाली नाहीत तर पगार कसे होणार? त्यामुळे  त्यांनाही तस वागणं भाग पडत.

पण या परिस्तिथीत मनापासून शिकवण्याची आस असून देखील दुर्लक्ष्य करावं लागत आणि त्या कळपातील मेंढ्यां प्रमाणे चालणं बंधनकारक होत. कारण जी २-४ मुलं  खरोखर शिकण्यासाठी येतात तीही शेवटच्या  वर्षात जाईपर्यंत सर्वां सारखीच उद्धट बनून जातात ,बदलून जातात . बाहेर एक्सट्रा क्लास जॉईन करत असल्यामुळे कॉलेज मध्ये शिकवण्यात लक्ष्य देत नाहीत . मग विद्यार्थ्यांना जर शिक्षकांची आणि शिकण्याची गरज नाही तर शिक्षक किती मागे फिरेल यांच्या?

म्हणून आज विद्यार्थी कस्टमर झाले आणि शिक्षक व्यावसायिक !!!!!

काही विद्यार्थी नापास झाले कि आत्महत्या सारखे प्रकार करतात त्यांच्या मुळे सरकारने अभ्यासक्रमात बदल केले, पास होण्यासाठी सोप्या पद्धती आणल्या आणि तेंव्हा पासुंन शिक्षणाची गुणवत्ता च कमी होऊन गेली.

आज प्रत्येक शिक्षक विचार करतो माझ्या शिकवण्याला जर किंमत मिळत नसेल तर मला माझा पगार मिळत आहे. मी कशाला इतका आटापिटा करून शिकवू ? विद्यार्थ्यांना आज शिक्षणाची गरज नाही त्यांना फक्त डिग्री ची गरज आहे. नाही का ?

आजच्या या परिस्तिथीला सरकार, शिक्षण पद्धती , बदलेल अभ्यासक्रम आणि पद्धत , शिक्षक , विद्यार्थी आणि पालक सर्व जबाबदार आहेत .


तुम्हीही तुमचे मत मला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा. 

धन्यवाद !

2 comments:

  1. खुप छान आजकल असे चालले आहे सगळीकडे

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिले आहे आणियामधूनयाआताची सत्य परिस्थिती लिहिली आहे

    ReplyDelete