Thursday, 23 April 2020

jeevan pravas__आयुष्य हे

                                                                   आयुष्य हे


आज बऱ्याचं दिवसांनी वेळ मिळाला काही तरी लिहिण्या साठी. वेळ मिळाला म्हणजे या आधी कधी अस वाटलच न्हवत की  मी कधी असं लिहू शकेन. आज मला माझ्या यजमानांनी प्लॅटफॉर्म सांगितला कि मी कस आणि कुठे लिहू शकते . त्यांना  मी प्रथम धन्यवाद देते.  आज मी माझ्या जीवन प्रवासात भेटलेल्या एका स्त्री ची कहाणी   सांगत आहे.  वसुधा एका छोट्या शहरात राहणारी मुलगी . वर्ण गोरा आणि बांधा माध्यम असेल फार काही चुणचुणीत नाही पण खूप अल्लड अशी एकंदरीत तीच वर्णन आहे. तिची आई एका छोट्या खेडेगावातून लग्न करून शहरात आली होती. वडिलांचा भाजीपाल्याचा व्यवसाय होता पण घरी प्रॉपर्टी म्हणाल तर खूप होती .वसुधा च्या वडिलांना हल्ली दारूचं व्यसन लागलं होत त्यातच त्यांनी त्यांची खूप प्रॉपर्टी घरी न सांगता विकून टाकली होती. वसुधा ला एक मोठा भाऊ होता विनायक. वसुधाच्या आजोबांना कॅन्सर सारखा आजार असल्या कारणाने  ते किती तरी वर्ष अंथरुणाला खिळून होते. आता तुमच्या लक्षात आलेच असेल त्यांच्या कुटुंबात पाच माणसे राहत होती. खाणारी तोंड पाच आणि कमावणारा एकटा वसुधाचा बाप होता. दोन लहान मुलं शाळेत शिकत होती. आई चा पूर्ण दिवस सासऱ्यांची सेवा करण्यात आणि त्यांनी मागेल तो पदार्थ करून घालण्यात दिवस जायचा. वडील दिवसभर भाजी विकून मिळेल त्या पैश्यां पैकी दारू पिऊन घरी यायचे. असा दिनक्रम चालू होता. वसुधाच्या आईला मात्र याचा खूप त्रास होत होता. त्यातच भर म्हणून त्यांच्या घरी त्यांच्या पाहुण्यांची सारखी वर्दळ असायची, सासऱ्यांच्या सेवे सोबत तिच्या आईला त्यांच्या पाहुण्यांची उठाठेव करावी लागत असत. तिच्या आई ला सतत तिच्या मुलांची काळजी लागलेली होती . कारण दारुड्या नवऱ्या सोबत तिला असं किती दिवस काढावे लागणार तिला सुद्धा माहिती न्हवत. सतत चिंतेत असणारी वसुधेची आई नेहमी गप्प असायची तीच दुःख ती कोणाला सांगत नसत. वसुधा मात्र या गोष्टीं पासून अलिप्त होती कारण खेळकर आणि अल्लड वसुधा लहान असल्यामुळे तिला या गोष्टी कळत न्हवत्या. एक दिवस तिचे वडील खूप दारू पिऊन घरी आले आणि तिच्या आईला खूप मारू लागले . दोन्ही मुलं  दचकून जागी झाली आणि घाबरून जिन्या खाली लपून बसली. आपल्या बापाला अश्या अक्राळ-विक्राळ रूपात त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं होत.  

विनायक आता थोडा मोठा झाला होता तो घरच्या कामात आईला मदत करत असे. वसुधा पण लहान असली तरी त्या घटनेमुळे  तिच्या बाल  मनावर थोडा का होईना बदल झाला होता. वसुधा आता तिच्या खेळण्या कडे जास्त लक्ष्य न देता आईला मदत करण्यात वेळ घालवू लागली होती. माय-लेकरांना या अश्या परिस्थितीची आता जणू सवयच लागून गेली होती.असे तब्बल पाच वर्ष चालू असताना वसुधाचे आजोबा देवा घरी गेले. तिच्या वडीलांच्या स्वभावा मध्ये फारसा बदल झाला नसला तरी मुलं मोठी झाली आहेत आता बायकोला मारहाण कारण चुकीचं आहे असं समजावण्याचा हर तर्हेने प्रयत्न करून थकलेली मंडळी आता कमीच होऊ लागली होती. आजोबा गेल्या मुळे वसुधेच्या आईला कामाचा त्रास कमी झाला  होता. आता विनायक दहावी पास होऊन पुढच्या वर्गात शिकत होता आणि वसुधा नववी मध्ये होती. एके दिवशी वसुधेच्या आईला पोटाचा त्रास होऊ लागला म्हणून तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलेले विनायकाचे वडील घाबरले होते कारण हि तसच होतं.वसुधेच्या आईच्या पोटाची शस्त्रक्रीया करायला लागणार होती आणि त्या साठी खूप पैसे हि हवे होते. या बरोबर घरची काम करता येणार न्हवती. वसुधा ची आई तर पुरती घाबरली होती. तिला माहित होत दारुड्या नवऱ्याने कधी आपल्या मुलांना खायला खाऊ आणला नाही, कधी त्यांच्या शाळेत सोडायला गेला नाही, त्यांना कधी नीट पुस्तकं  घेऊन दिल नाही कि शाळेचा गणवेश . प्रॉपर्टी असली तरी काय कामाची होती. कोड-कौतुक लाड करायच्या वेळी केले

न्हवते आणि आता अपेक्षा हि न्हवती. शेजारच्या मुलांची फाटकी पुस्तकं आणि गणवेश घेऊन आत्ता पर्यंत शिक्षण घेणारे वसुधा-विनायक मनातून आईच्या शत्रक्रियेची बातमी ऐकून खूप घाबरून गेले होते. त्यांना खात्री वाटत न्हवती कि त्यांचे वडील आपल्या आईची शस्त्रक्रिया करण्या साठी पैसे गोळा करतील. अशा परीस्थितीत त्यांच्या वडिलांनी राहते घर गहाण ठेऊन पैसे उभे केले . नाही तरी ते कधी ना कधी होणारच होत . पण समाधान याच होतं कि ते पैसे आता आईच्या शस्त्रक्रियेसाठी उपयोगी येणार. 

थोड्या दिवसांनी शत्रक्रिया  यशस्वी झाली आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या दुसऱ्या घरी राहण्यासाठी गेले. कारण आधीच्या घरा  पासून दवाखान्याचे अंतर खूप होते ,ते सोईस्कर व्हावे म्हणून ते दवाखान्या शेजारी असलेल्या त्यांच्या दुसऱ्या घरी राहण्या साठी गेले होते. नवीन घर आधीच्या घरापेक्षा खूप प्रशस्त आणि छान होते. पण त्या मागचे सत्य न जाणणारी मंडळी मात्र खुश होती. वसुधाच्या वडिलांनी त्या घरासाठी खूप कर्ज केले होते आणि याची कल्पना त्या तिघांनाही न्हवती. असो ! घरात आई आजारी वडील दारुडे असताना विनायकाचे शिक्षण १२ वीचे चालू होते आणि वसुधा दहावी मध्ये शिकत होती. आई बरी झाली असली तरी ती खूपच स्थूल आणि थकलेली होऊन गेली होती. अशातच काळाने घात  घातला आणि वसुधाच्या वडिलांचा अपघात झाला. त्यामध्ये त्यांचा हात व पाय निकामी झाला तो कायमचा. आता थोडा फार पैसा येत होता तोही पूर्ण बंद झाला होता. शिवाय अपघात मध्ये खूप खर्च करून अपंग झालेल्या वडिलांची अवस्था पाहून वसुधा पूर्ती गोंधळून गेली होती. घरची जबाबदारी तिच्या आणि विनायकाच्या अंगावर येऊन कोसळली. शिवाय वसुधाच्या आजोळी कोणी मदत करणारे न्हवते. बिचारी वसुधा दहावी मध्ये नापास झाली. अभ्यासामध्ये जेमतेम असणारी वसुधेचे मन आता अभ्यासातून कायमचे निघाले होते आणि तिनी घरचीच कामे करण्याचे ठरवले. विनायक मात्र बारावी मध्ये पास झाला असला तरी त्याला नोकरी करणे भाग होते. त्याने एका किराणा दुकाने मध्ये नोकरी धरली आणि त्यामधून त्याने घराला हातभार लावायला सुरुवात केली. रोज रोज पोटाचा प्रश्न आणि त्यातच नवऱ्याचा औषधांचा खर्च दिवसेंदिवस करणं अवघड झालं. आता विनायक ला कुठे तरी चांगली नोकरी धरणं भाग झालं. पण अपुरे शिक्षण आणि घरची बिघडलेली परीस्थिती मध्ये चांगली नोकरी आणि शिक्षण करणे विनायकला अवघड  झाले होते.  पण देवाच्या दयेने विनायकला एका कंपनी मध्ये नोकरी मिळाली व त्याला आता त्याचे घर सांभाळता येऊ लागले. अशी सुमारे चार वर्ष चालले होते. घरात बाप आजारी आईच पण दुखणं असायचं भाऊ कष्ट करून नोकरी करतो आहे हे पाहून वसुधाने विणकाम भरतकाम करून पैसे मिळवायला सुरुवात केली होती. 

एक दिवशी वसुधा च्या आई वडिलांनी वसुधाचं लग्न करण्याचा विचार केला. खूप स्थळ ही येत होती पण वयामध्ये अंतर आहे , पत्रिका जुळत नाही, मुलगा दिसायला चांगला नाही अशी बरीच कारण झाली आणि शेवटी देवाने स्वर्गात बांधून ठेवलेला वर मुलीला पाहायला वसुधाच्या घरी आला. कांदे पोहे झाले लागण ठरलं . सर्व आनंदात पार पडलं . वसुधाच चांगलं झालं . सुटली बिचारी आई-बापाच्या घरून असं जरी वाटत असल तरी सत्य मात्र खूप वेगळं होत. कधी कधी माणसाला इकडे आड आणि तिकडे विहीर असं होऊन जात . तसेच काही वसुधाच्या बाबतीत झालं. आगीतून सुटून फुपाट्यात पडली होती वसुधा. 

वैवाहिक जीवन  जेमतेम चाललं होत. घरात सासू सासरे ,एक मनोरुग्ण असलेला  दीर , आणि वसुधा व तिचा नवरा किशोर असा परिवार होता. वसुधा त्या सर्वां सोबत मिळत  जुळत घेत असताना तिची दमछाक व्हायची. तिची सासू खूप खाष्ट होती . तिला तिच्या सासूचा खूपच जाच  होता. तिनी तिच्या प्रेमळ आणि मन मिळावु स्वभावाने सर्वांची मने जिंकून घेतली होती. आता कुठे सुरळीत होत होत तेवढ्यात किशोरची नोकरी गेली. आता नवीन नोकरी शोधावी लागणार त्यासाठी किशोर शहरात गेला . वसुधा मात्र गावीच  राहिली होती. तिला तिथे एकटीने राहणे अगदी जीवावर यायचं . ती याच कल्पनेनी खुश व्हायची किशोरला नोकरी मिळाली कि ती पण शहरात जाणार. आता किशोरला नोकरी मिळाली न्हवती त्यामुळे तीच शहरात जाणं अजूनच लांबणीवर पडलं होतं. एक वर्ष गेलं तेंव्हा किशोरला नोकरी मिळाली. आणि शेवटी वसुधाच्या आयुष्यातला तो सोनेरी दिवस उगवला. आता वसुधा किशोर सोबत शहरात जाणार होती. गावी असताना त्या दोघांना एकांत असा मिळालाच न्हवता आता तरी तो मिळेल आणि सुखाचे दिवस सुरु होतील असे वसुधाला वाटत होते. 

वसुधा आणि किशोर शहरात राहायला गेले. जाताना वसुधेला लग्नात जे काही भांडी दिली होती ती सर्व ती घेऊन गेली होती ती गावी कधीच न येण्याच्या विचाराने . कारण सासूच्या छळा ला आणि मनोरूग्ण असलेल्या दिराला ती कंटाळली होती. इकडे वसुधा व किशोरने आपला छोटासा संसार मंडल होता. वसुधा हि नोकरी करायची दोघे नोकरी करून संसाराला हात भार लावायचे , गावी पैसे पाठवायचे. सर्व काही  सुखात आणि सुरळीत चालले होते. वसुधाचे आई वडील आणि भाऊ यांचं पण आता ठीक चाललं होत. लग्नाला दोन वर्ष होत आले होते आणि ज्याची सर्व जण वाट पाहत होते ती बातमी आली . वसुधाला  दिवस गेले होते. सर्व काही आनंदात होते. वसुधेला तर परमानंद झाला  होता. वसुधे ची आई तर बाळाची स्वप्न पाहून हरकून गेली होती. आजी व्हायच्या कल्पनेत गडून गेली होती. वसुधेला आता तिसरा महिना लागला होता. सर्व रिपोर्ट नॉर्मल होते. तिच्या मनावरचे दडपण कमी झाले . किशोर आता ओव्हरटाईम करून जास्त पैसे मिळवू लागला . त्या दोघांना बाळाची स्वप्ने बघून बघून खरोखरच बाळ घरात असल्या सारखं वाटत . दोघे खूप आनंदात होते आणि जबाबदार सुद्धा. 

एक काळाकुट्ट अंधार त्या दोघांच्या आयुष्यात घेऊन येणार तो दिवस उजाडला . वसुधेला उलट्या व्हायला सुरुवात झाली. तिला चक्कर हि येत होती . त्या दिवशी किशोर लवकरच कामावर निघून गेला होता कारण सायंकाळी लवकर येऊन त्यांना दवाखान्यात जायचे होते. वसुधाने नेहमीची काम उरकली. दुपारी जेवण केलं . किशोरला फोन सुद्धा केला व जाऊन झोपणार इतक्यात जोराची चक्कर आली आणि ती धाडकन जमिनी वर कोसळली . तिच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. तिला त्या वेदना सहन होत न्हवत्या. आता शेजारी कळवल्या शिवाय पर्याय न्हवता . शेजारच्या काकूंनी तिला दवाखान्यात नेले पण जे नको होते तेच झाले. वसुधेचे बाळ गेले!
वसुधा ला खूप दुःख झालं . तिनी पाहिलेली स्वप्न तुटली त्यांचा चुराडा झाला होता . ती जखम तिच्या मनावर खोल वर रुतली होती. किशोर तिला समजून घेत होता वेळो-वेळी समजावून सांगत होता. किशोर मुळातच शांत आणि गोड स्वभावाचा असल्यामुळे त्याने वसुधाला समजून घेऊन या परिस्तिथीमधून तिला बाहेर काढलं होत. आणि त्यांचा संसार पुन्हा एकदा नव्याने सुरु झाला होता. 

पण त्या विधात्याच्या मनात काही वेगळंच होत. त्याच्या समोर कितीही प्रार्थना केल्या कितीही गयावया केल्या तरी त्या सठविणे लिहलेलं नशीब काही बदलता येत का? आज वसुधा आणि किशोर यांच्या लग्नाला पंधरा वर्ष झ्हाली सर्व दवाखाने सर्व उपाय करूनही त्यांना संतती सौख्य मिळालं नाही . आता वसुधा कंटाळून गेली आहे तिचा हिरमोड झाला. किशोर सुद्धा या नशिबावर खिन्न आहे . पण आशेचा किरण अजून मनात आहे. वसुधा मात्र कधी खूपच निराश झाली कि आत्महत्येचा विचार करते. तुम्हाला काय वाटत तिनी काय करावं ? काही वर्ष लोटून जातात . 


अरे  हो !आनंदाची बातमी हि कि वसुधा आता गरोदर आहे . लवकरच तिला बाळ होणार आहे आणि हरवलेली सुख माघारी येणार आहेत. 


पण वसुधाच्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असत ? जेंव्हा आत्महत्येचा विचार मनात यायचा तेंव्हा तुम्ही काय केलं असत ? असं आयुष्य तुमच्या वाट्याला आलं असत तर तुम्ही काय केलं असत ? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा . 


धन्यवाद !!!





No comments:

Post a Comment