Saturday, 16 May 2020

तरंग

सकाळी पाच चा गजर वाजला आणि मी झोपेतून जागी झाले. मला आज कॉलेजला लवकर जायचं आहे. खूप उशीर झाला!!  कॉलेज माझ्या घरापासून बरेच दूर असल्यामुळे मला रोजच लवकर उठून तयार व्हावं लागत . आज माझा सेमिनारचा विषय नक्की करायचा आहे. तस तर सर्वांना मॅडम नी आपल्या आपल्या आवडीचे विषय घ्या आणि सादर करा असेच सांगितले आहे. पण मला मात्र आवर्जून उद्या लवकर कॉलेजला ये!  मी देईल त्याच विषया वर सेमिनार दे असं खडसावणाऱ्या मॅडम चा मला खूपच राग आला होता.

मी घाईघाईने माझं आवरलं आणि दोन बिस्किटे तोंडात कोंबून लॅपटॉप आणि बॅग घेऊन बस च्या दिशेने धावत सुटले. आज माझी बस चुकली असती तर मॅडम नी अजून दोन दिवस तरी विषय नक्की करायला घालवले असते. मॅडम खूपच शिस्तप्रिय आहेत पण त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांची अडचण समजून घ्यायला हवी कि नको?  असो

मी अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवीचे (पोस्ट ग्रॅड्युएशन) शिक्षण घेत आहे आणि ते ही सिग्नल प्रोसेसींग सारख्या मला तरी अवघड वाटणाऱ्या विषया मध्ये . आणि माझ्या प्रोजेक्ट गाईड आहेत अनुराधा मॅडम . अनुराधा मॅडम अँटेना या विषया मध्ये डॉक्टरेट पदवीचे शिक्षण घेत आहेत . त्या PHD च्या शेवटच्या वर्षाला आहेत.  जो करतो त्यालाच धारेवर धरतात या म्हणी प्रमाणे मलाच त्यांनी निशाणा बनवला होता. नेहमी बाकीच्यांना सूट आणि मला मात्र अवघड विषय देऊन त्या विषया बद्दल माहिती शोधायला पिटाळायचं हे त्यांचं आवडत कामच असावं . इंजिनिअरिंग हि विज्ञानाचीच शाखा आहे आणि माझा विज्ञान हा पहिल्यापासूनच आवडता विषय असल्यामुळे मलाही हे काम आवडते .

कदाचित त्यांना माझं काम आवडत असेल ? कदाचित त्यांना माझ्यात ती चमक दिसत असेल ? देव जाणे आज काय वाढून ठेवलं आहे माझ्या नशिबात. देवा आज तरी वाचावं तुझ्या पोरीला !!

मी कॉलजे मध्ये पोहोचण्या आधीच मॅडम त्यांच्या खोलीत काही तरी वाचत बसल्या होत्या. मी दरवाजा जवळ धापा टाकतच पोहोचले .

मे आय कम इन मॅम ? मी

एस ! कम इन .  यु आर टू  मिनिट्स अँड ट्वेन्टीथ्री सेकंड्स लेट!!! मॅडम

जास्त विषय वाढायला नको म्हणून मी पटकन सॉरी म्हणून रिकामी झाले.

सॉरी मॅडम ! नेक्स्ट टाईम आय विल बी ऑन टाईम.  मी 

पटकन सॉरी म्हणाल्या मुळे कदाचित त्यांचा राग गेला असावा. मग त्या सेमिनार च्या विषयाबद्दल बोलू लागल्या .
आधीच खूप साऱ्या कागदांचे गट्ठे त्यांच्या टेबल वर पडले होते. त्या मला १-१ विषय सांगत होत्या.

हा विषय थोडा अवघड आहे . तो असा विषय आहे . या विषयाबद्दल तुला काही माहिती आहे का ? असं विचारत असताना माझा खूपच गोंधळ उडाला . मी थोडी अवघडली होते लॅपटॉप च्या ओझ्याने माझं गाढव झालं होत. मग डोकं वर काढून त्यांनी एकवार माझ्यावर कटाक्ष टाकला . आणि मला बसायला खुणावले. मग मी लॅपटॉप ठेऊन एकदाची त्यांच्या समोर बसले . त्यांची  बऱ्याच कागदांची उलथापालथ झाल्या  नंतर त्यांनी एक विषय शोधून काढला तू  SAR value या विषया वर सेमिनार दे . काही मदत लागली तर सांग . एवढं बोलून त्यांनी जाण्यासाठी ची शांतता पसरवली. मी अर्थातच त्यांना घाबरत असल्यामुळे मला त्या विषया बद्दल एकटीलाच निपटून घ्यायचे होते . त्यांची मदत घेणं म्हणजे चारचौघात इभ्रत काढण्या प्रमाणेच होत.

SAR value हा मॅडम च्या PHD चा विषय होता. मला  तिथल्या बाकीच्या मॅडम नी च ही गोष्ट सांगितली होती.  विषय तर बदलून मिळणार नव्हता पण मॅडम चे या विषय मधील ज्ञान भरपूर असल्यामुळे काहीतरी बरळून चालणार नव्हते. मी तयारीला लागले.

मी खूप संशोधनाचे निबंध वाचून काढले. तेंव्हा मला कळालं SAR value हे अँटेना शी निगडित आहे.
मला आधी अँटेना काय आहे आणि मग त्याची SAR value काय असते हे सर्व जाणून घ्यायची उत्सुकता वाढू लागली. विषय फारच रंजक असल्यामुळे मी खूप माहिती गोळा केली. तुम्हाला पण नक्की आवडेल.

अँटेना (antenna ) म्हणजे दूरदर्शन किंवा आकाशवाणी यांचे संदेश घेणारी काम्बी . कदाचित अँटेना म्हणलं कि तुम्हाला तो जुना सीन आठवत असेल . महाभारत मालिका दूरदर्शन वर लागायची आणि जर चुकून सिग्नल गेला कि , एक इंजिनीअर अँटेना हलवत बसणार , एक जण दारात ओरडून सांगणार चित्र आलं कि नाही . चित्र दिसे पर्यंत तो अँटेना हलवून निश्चित करायचा कार्यक्रम चालायचा मगच तो अँटेना सोडून द्यायचा.  हो! हो ! तोच आहे हा अँटेना .

शास्त्रीय भाषेत सांगायचं म्हणाल तर अँटेना म्हणजे असं साधन आहे जे एका शक्तीचे दुसऱ्या शक्ती मध्ये रूपांतर करते आणि टीव्ही किंवा रेडिओ (विद्युत चुंबकीय लाटा ) च्या लाटा प्रसारित किंवा प्राप्त करते.

जेम्स क्लार्क मॅक्सवेल च्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिद्धांताप्रमाणे भविष्यवाणी केलेल्या लाटांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जर्मन भौतिक शास्त्रज्ञ हेनरिक हर्ट्झ याने १८८८ मध्ये पहिला अँटेना बांधला होता. तेंव्हा पासून अँटेनाचा जन्म झाला.

अँटेना चा वापर हा कोणत्याही रेडिओ रिसिव्हर किंवा ट्रान्समिटर चे विद्युत connection  विद्युत  चुंबकीय लाटांशी करून देण्यासाठी होतो . रेडिओ लाटा म्हणजेच विदयुत चुंबकीय लाटा ह्या प्रकाशाच्या वेगाने हवेतून किंवा अंतराळातून प्रवास करतात. कोणत्याही वायरलेस कॉम्युनिकेशन मध्ये संदेश सिग्नल हा निर्वात पोकळीतून प्रवास करतो. संदेश पाठवणे आणि प्राप्त करून देण्याचे काम अँटेनांचे असते . तर ट्रान्समीटरने ट्रान्स्मिट केलेल्या संदेश सिग्नलची शक्ती कमी असल्यामुळे तो जास्त अंतर पार करण्यास असर्मथ असतो तेंव्हा सिग्नलचे मोडूलेशन केले जाते . मोडूलेशन म्हणजे लहान शक्ती असलेला सिग्नल जास्त शक्ती असलेल्या कॅरिअर सिग्नल वर बसवून पाठवला कि तो जास्त अंतरावर असलेल्या रिसिव्हर ला जाऊन मिळतो . रिसिव्हर नंतर डीमोडूलेशन करून मूळ सिग्नल प्राप्त करतो. संदेश सिग्नल हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक waves वाहून नेत असतात .   ड्रिल मशीनचे रिबिट जसे भिंतीला होल पडताना भिंतीमध्ये घुसते त्या प्रमाणे या लाटा निर्वात पोकळीतून प्रवास करतात . आता तुम्हाला थोडी अँटेनाची कल्पना आली असेल.

अँटेना च नक्की काम काय असते ? तर अँटेनाचे कार्यकारी तत्व असे आहे कि,  हा हवेतील पोकळी मध्ये  विद्युत प्रवाहाचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये रूपांतर करतो तर पुन्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन चे विदयुत प्रवाह मध्ये रूपांतर करतो. थोडक्यात सांगायचं म्हणाल तर ,अँटेना हे साधन दोन उपकरणामध्ये संभाषण घडवून आणण्यासाठी कारणीभूत असते.जसे कि उपग्रहासोबत संभाषण (satellite communication )  त्यासाठी एक ट्रान्समीटर आणि रिसिव्हर लागतो . ट्रान्समीटर च्या बाजूला जो अँटेना असतो तो विदुत प्रवाहाचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये रूपांतर करून संदेश पाठवतो त्या अँटेना ला तुम्ही ट्रान्समीटिंग अँटेना म्हणू शकता. म्हणजेच पृथ्वीवरून तुम्ही या अँटेना द्वारे संदेश पाठवला , आता हा संदेश हवेतील पोकळी मधून वाहत जाऊन  दुसऱ्या उपकरणाच्या बाजूला जो  रिसिव्हिंग अँटेना असतो त्याला संदेश मिळतो . हा रिसिव्हिंग अँटेना इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे पुन्हा विद्युत प्रवाह मध्ये रूपांतर करतो. म्हणजेच उपग्रहावरील रिसिव्हिंग अँटेना हे काम करतो . अशा प्रकारे अँटेना द्वारे आपण उपग्रहासोबत कॉम्युनिकेशन करू शकतो.

अँटेना चा शेप हा वेग वेगळा असतो तर त्याची साईझ  सुद्धा त्याच्या वापरावर अवलंबलेली असते.
म्हणजे अँटेना तुम्ही कोणत्या कामासाठी वापरणार आहे त्यावर अँटेनांची साईझ आणि शेप ठरलेला असतो. सर्वसामान्यतः अँटेनांचा आकार हा ऑपरेटिंग frequency वर एक चतुर्थांश (λ / 4) आणि अर्धा (λ / 2) तरंगलांबीवर असतो . जर ऑपरेटिंग frequency जास्त असेल तर wavelength (तरंगलांबी ) कमी असते आणि अँटेनांचा आकार कमी असतो. तुम्ही उपग्रहासोबत कॉम्युनिकेशन करण्यासाठी अँटेना वापरत असाल तर तुम्हाला गोलाकार असलेला डिश अँटेना वापरावा लागेल .  उपग्रहासोबत कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला  0.3Ghz ते 30Ghz या frequency चा वापर करावा लागतो तर त्यासाठी लागणाऱ्या अँटेनांची साईझ हि अंदाजे 13ft एवढी असते. याउलट मोबाईल फोन मध्ये वापरला जाणारा  अँटेना खूप लहान आकाराचा असतो. अगदी मायक्रो मिलीमीटर मध्ये. अँटेना या विषया मध्ये आता बरीच प्रगती होत आहे .

 डिश अँटेना, वायर अँटेना , लेन्स अँटेना, हॉर्न अँटेना, अरे अँटेना , मायक्रो  स्ट्रीप अँटेना असे बरेच अँटेनांचे प्रकार आहेत.  त्यामध्ये गोलाकार असलेला डिश अँटेना आपण उपग्रहासोबत कॉम्युनिकेशन करण्यासाठी , टीव्ही साठी, खगोलशास्त्र , रडार , space communication इत्यादी साठी वापरू शकतो . वायर अँटेना हा सरळ , वेटोळे असलेला असतो . हा अँटेना गाडीमध्ये , अंतराळयान , जहाज आणि मोठ्या इमारतीमध्ये  वापरला जातो.  लेन्स अँटेना शक्यतो खूप जास्त frequency असलेल्या कामासाठी वापरतात तर हॉर्न अँटेना मुख्यत्वे उपग्रहावरील कम्युनिकेशन आणि रेडिओ टेलेस्कोपी साठी वापरला जातो . हॉर्न अँटेना हा गिरणीच्या सुपासारख्या आकाराचा असतो. मायक्रोस्ट्रीप अँटेना मोबाईल फोन, क्षेपणास्त्र , अवकाशयान इत्यादी मध्ये वापरतात. अरे अँटेना सामान्यतः वाहने, विमान, जहाज , उपग्रह आणि बेस स्टेशन वर बसविली जातात.

अँटेनांचे बरेच घटक आहेत त्यावरून अँटेनांचे  एखाद्या कामासाठी निवड होते. गेन , बॅण्डविड्थ , frequency , रिटर्न लॉस , VSWR , रेडिएशन पॅटर्न इत्यादी घटक अँटेनांची कार्यप्रणाली ठरवतात .
गेन हा घटक अँटेना एकाच दिशेला किती पॉवर देत आहे त्यावर अवलंबून असतो. जेवढा जास्त गेन तेवढी अँटेनांची कार्यप्रणाली चांगली असते.

बॅण्डविड्थ हा दुसरा महत्वाचा घटक आहे. बॅण्डविड्थ हा frequency ची श्रेणी दर्शवितो ज्यावर अँटेना ऊर्जा उत्सर्जित किंवा प्राप्त करू शकतो. जास्त बॅण्डविड्थ असेल तर जास्त सिग्नल पास होतो.

अँटेनांची frequency,  अँटेना कोणत्या कामासाठी वापरणार आहे त्यावर अँटेनांची frequency ठरलेली असते . जेवढी जास्त frequency असेल तेवढा अँटेना लहान असतो तर जेवढी कमी frequency असेल तेवढा अँटेना मोठा असतो.

रिटर्न लॉस हा अँटेनांचा घटक अँटेना किती प्रमाणात ऊर्जा रिफ्लेक्ट करते यावर अवलंबून असतो . जेवढी ऊर्जा डिव्हाइस ला दिली  जाते तेवढी त्याने घेणे आवश्यक असते पण काही प्रमाणात ऊर्जा रिफ्लेक्ट होते त्याला रिटर्न लॉस म्हणतो तो जास्तीत जास्त कमी असेल तर अँटेना ची कार्यप्रणाली चांगली असते .

VSWR म्हणजे voltage standing wave ratio . जेवढा अँटेना आणि ट्रान्समिशन लाइन परफेक्ट मॅच असतील तेवढा VSWR कमी असतो. VSWR ची किंमत जेवढी कमी असेल तेवढा अँटेना चांगला .

याव्यतिरिक्त बरेच घटक आहेत जसे कि डिरेक्टिव्हिटी. अँटेना जेवढा एकाच दिशेने ऊर्जा उत्सर्जित करेल तो अँटेना वापरासाठी चांगला असतो .  या घटकांवरून अँटेनांचे परीक्षण केले जाते त्या सोबत त्याची साईझ जर कमी असेल ,तर तो अँटेना कामाचा आहे असे मानले जाते .

या वरून तुम्हाला अँटेना म्हणजे काय आणि तो कुठे व कसा वापरतात  हे समजले असेलच ! मला तरी आता या विषय मध्ये रस वाटू लागला आहे . किती वेगवेगळ्या प्रकारचे अँटेना असतात . मला तरी फक्त मोबाईल , टीव्ही , satellite इत्यादी मध्ये वापरणारे अँटेना माहित होते पण मोबाईल फोन मधला अँटेना प्रत्यक्ष पहिला नाही . त्यामुळे मला मोबाईल अँटेना कसा असतो हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली.

मोबाईल फोन मध्ये मायक्रोस्ट्रीप पॅच अँटेना जास्त वापरला जातो.त्यामध्येही MIMO अँटेना, monopole  अँटेना, PIFA अँटेना इत्यादी प्रकार आहेत .  हा अँटेना म्हणजे सर्किट बोर्ड वर असलेल्या मेटल ट्रॅक सारखाच दिसतो. आपण घरामध्ये जर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बिघडली तर ती वस्तू खोलून पहिल्या नंतर आत मध्ये एक हिरव्या रंगाचा बोर्ड दिसतो त्यावर हिरव्या रंगाचे मेटल ट्रॅक असतात . मोबाईल फोन मध्ये असलेला  मायक्रोस्ट्रीप पॅच अँटेनासुद्धा असाच मेटल ट्रॅक असल्या सारखा असतो. मोबाईल अँटेना हा multiband असतो म्हणजे तो एका पेक्षा जास्त frequency ला काम करतो. सध्या वापरात असलेले स्मार्ट फोन मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त अँटेना असतात . एक अँटेना रेडिओ सिग्नल ट्रान्स्मिट आणि रिसिव्ह करतो म्हणजे व्हॉइस कॉम्म्युनिकेशन साठी ४G LTE  अँटेना असतो, तसेच ब्लूटूथ, GPS , Wi -Fi साठी सुद्धा मोबाईल फोन मध्ये अँटेना असतात.

या नंतर मी SAR  value काय असते या विषयाकडे वळणार आहे. मॅडम नी मला प्रथम  SAR  value ऑफ मोबाईल  अँटेना असे शोधायला सांगितले होते. मी त्याप्रमाणे शोध सुरु केला . पण राहून राहून मला एक प्रश्न सतावत होता तो असा कि , अँटेनांचे वर सांगितल्या प्रमाणे जे घटक अँटेनांची कार्यप्रणाली ठरवतात ते घटक आपण कमी जास्त कसे करू शकतो ? म्हणजेच मला पाहिजे तो आणि पाहिजे तसा अँटेना मी कसा डिझाईन करू शकते ? मी पुन्हा शोधायला सुरवात केली . जवळ जवळ २०-२५ संशोधनाचे निबंध वाचले त्यावरून मला समजले कि जेव्हा आपण अँटेना डिझाईन करतो तेंव्हा मॅनुफॅक्चरिंग मटेरियल मध्ये बदल केले , अँटेनाचे काही पॅरामीटर म्हणजे डायेलेकट्रीक कॉन्स्टन्ट , परमिटिव्हिटी , सब्स्ट्रेट ची जाडी वाढली किंवा कमी केली तर हे घटक कमी जास्त करू शकतो . किंवा अँटेना चा शेप आणि साईझ कमी जास्त केली तरीही हे घटक आपण बदलू शकतो आणि पाहिजे तसा अँटेना बनवू शकतो. स्प्लिट रिंग रेसोनेटर नावाचा अजून एक प्रकार आहे जो हे अँटेनांचे घटक बदलू शकतो.


 मेटामटेरिअल हे कृत्रिम पदार्थ आहे जो निसर्गात सापडत नाही ज्या मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक घटक असतात. स्प्लिट रिंग रेसोनेटर हे  मेटामटेरिअल पासून बनवतात  . या मुळे आपण अँटेनांचे काही घटक बदलवून आपल्याला पाहिजे तास अँटेना बनवू शकतो.

आहे ना मजेशीर ?

आता मी SAR  value ऑफ मोबाईल अँटेना  या विषयाकडे वळले !

प्रथम आपण SAR  value काय आहे हे जाणून घेऊ .म्हणून मी शोधायला सुरुवात केली ....

जेंव्हा आपण मोबाईल फोन वापरतो तेंव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक waves हवेतून प्रवास करत असतात . तुमचा संदेश असलेले सिग्नल या इलेक्ट्रोमॅग्नेटिक wavesवाहून नेतात . पुढे अँटेना द्वारे हे सिग्नल ट्रान्स्मिट आणि रिसिव्ह होतात. जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक waves संदेश सिग्नल वाहून नेत असतात तेंव्हा काही प्रमाणात सिग्नलचे dissipationहोते म्हणजेच काही सिग्नल ची ऊर्जा हवेमध्ये बाहेर पडते . अंदाजे सिग्नलच्या १०-२० % ऊर्जा हवेत  बाहेर पडते. यालाच मोबाईल  रेडिएशन असं म्हणले जाते. मोबाईल च्या वापरावर हे रेडिएशन लेव्हल अवलंबून असते . या रेडिएशन लेव्हल ला कंट्रोल करण्यासाठी SAR  म्हणजे स्पेसिफिक ऍबसॉरपशन रेट व्हॅल्यु वापरली जाते .
सध्या सरकारने मानवी हितासाठी मोबाईल च्या SAR  value वर काटेकोर निर्बंध घातले आहेत कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऍबसॉरबशन हे घातक आहे .

आपल्याला माहिती आहेच कि , मॉडर्न समाजात आजकाल वायरर्लेस सिस्टिम खूप लवकर आणि जास्त प्रमाणात वाढत आहे . लोकहीतासाठी ICNIR आणि IEEE  या आंतराष्ट्रीय संस्थांनी SAR  value कमी करण्याबाबत काही दिशादर्शक सूचना बनवल्या आहेत. ज्या मध्ये SAR  value ची मर्यादा जास्त नसावी व ती किमान किती असावी अशी माहिती पुरवली आहे. तसेच  WHO ने घेतलेल्या एका कार्यशाळेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिशनचे लहान मुलांवर होणारे परिणाम हि सांगितले आहेत.२०१६ मध्ये जवळ जवळ ७. ४ बिलिअन मोबाईल  चे वापरकर्ते होते आणि हि संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे , त्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा धोका सुद्धा वाढत चालला आहे . भारतामध्ये SAR  value हि १. ६ W/Kg पेक्षा कमी असली पाहिजे. ज्या  मोबाईल फोन ची SAR  value हि १. ६ W/Kg पेक्षा जास्त आहे ते फोन वापरण्यासाठी धोकादायक आहेत.

मोबाईल फोन मध्ये वापरले जाणारे MIMO अँटेना चे डिसाईन मध्ये बदल केले तर SAR  value कमी होऊ शकते . या मध्ये दोन प्रकार आहेत . हेड फँटम आणि फ्लॅट फँटम . हेड फँटम म्हणजे SAR  value  जेंव्हा मोबाईल डोक्याजवळ असतो . तेंव्हा डोक्यातील टिशूंनी ऍबसॉरब केलेले इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन . फ्लॅट  फँटम म्हणजे SAR  value जेंव्हा मोबाईल शरीरा जवळ असतो तेंव्हा शरीराने ऍबसॉरब केलेली इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. हेड फँटम हा फ्लॅट फँटम पेक्षा जास्त असतो .

इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे मानवाला बऱ्याच व्याधी होऊ शकतात जसे कि , हार्ट अटॅक , ब्रेन ट्युमर ,कॅन्सर इत्यादी . मोबाईल फोन शर्ट च्या  खिशात ठेवल्या मुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हृदयाजवळ जास्त होते त्यामुळे हार्ट अटॅक चे प्रमाण खूप वाढले आहे . तासंतास मोबाईल कानाला लावून बोलण्यामुळे कान  दुखणे , कमी ऐकू येणे , ज्या कानाने मोबाईल वर बोलता त्या बाजूचे डोके दुखणे किंवा डोक्याची त्वचा खाजणे या प्रकारची लक्षणे आढळली आहेत. तसेच मेंदूत रक्ताच्या गाठी होणे हे सुद्धा मोबाईल च्या अति वापरामुळे होणारे रोग आहेत. गर्भवती महिलांनी मोबाईल चा जास्त वापर केल्या मुले लहान अर्भकाचा मृत्यू किंवा लहानपणीच अटॅक येणे . स्पर्म काउन्ट कमी होणे , गर्भधारणा न होणे या सारखे आजार सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मुळे होतात . हे रेडिएशन कमी करण्यासाठी आपण मोबाईल फोन चा वापर कमी केला पाहिजे . शक्यतो  हेडफोन लावून बोलणे, मोबाईल उशीखाली ठेऊन झोपणे या गोष्टी टाळाव्यात .लिफ्ट , कार , विमान , ट्रेन मध्ये फोन वापरणे टाळावे तेव्हा रेडिएशन जास्त असते . मोबाईल ची बॅटरी कमी असल्यास मोबाईल फोन वापरू नये .

आपण आपला मोबाईल विकत घेताना बाकीचे स्पेसिफिकेशन पाहण्याबरोबर मोबाईल हॅण्डसेटचा SAR  value तपासला पाहिजे. . कोणत्याही मोबाईल च्या SAR  value  तपासण्यासाठी मोबाईल फोन वर *#07# हा नंबर डायल करून कॉल बटन प्रेस करा तुम्हाला तुमच्या मोबाईलचा SAR  value दिसेल. जेवढा कमी SAR  value असेल तोच हँडसेट विकत घ्या.  सध्या मोबाईल फोन च्या SAR  value कमी करण्याबाबत बरेच संशोधन चालू आहे . त्याच बरोबर नवीन आणि जास्त दूर अंतरावर कम्मुनिकेशन घडवून आणण्यासाठी लागणारे उच्च प्रतीचे अँटेना तयार करण्याबाबत सुद्धा बरीच संशोधन चालू आहे. नुकतेच पार पडलेले चंद्र यान मोहिमेवर हरवलेला विक्रम लॅन्डर सोबत कम्मुनिकेशन होत नाही त्यासाठी कम्मुनिकेशन सिस्टिम मध्ये सुद्धा संशोधन चालू आहे .

बापरे ! किती माहिती आहे या विषयांबद्दल . मी उगाच मॅडमनी दिलेल्या विषयावर सेमिनार द्यावा लागणार म्हणून निराश होते . पण आज मॅडम मुळे च मला या विषयाबद्दल ज्ञान मिळालं . मी सर्व माहिती गोळा करून एक प्रेसेंटेशन बनवलं आणि सादर केलं . सर्व माहिती गोळा केल्यामुळे मी सर्व बाजूने सर्व शंकांचे निरसन केले . या मध्ये जास्त विचारला जाणारा प्रश्न हा होता . सर्वात कमी SAR  value असलेला मोबाईल  हँडसेट कोणता ?  तर verykool vortex RS ९० या हॅण्डसेटची SAR  value  ०. १८ आहे त्यानंतर samsung galaxy note या हँडसेट ची SAR  value  ०. १९ इतकी आहे. सर्वांनी टाळ्या वाजून प्रेसेंटेशन ला प्रतिक्रिया दिल्या व मी मॅडमच्या समाधानपूर्वक चेहऱ्याकडे पाहून स्मित हास्य केले आणि माझा लॅपटॉप बंद केला .


धन्यवाद !

अँटेनाच्या जास्त माहितीसाठी कृपया या लिंक वर क्लिक करा.
http://ijariie.com/FormDetails.aspx?MenuScriptId=35106

तवा बटर नान


आज बऱ्याच दिवसांनी मला बटर नान आणि पनीर खाण्याची इच्छा झाली. पण बटर नान कसे बनवावे ? 
नेहमी हॉटेल्स मध्ये गेल्या नंतर व्हेज फूड ची ऑर्डर देताना पनीर मसाला आणि तंदूर नान किंवा बटर नान हे मेनू फिक्स असतात , आणि घरी जर पनीर मसाला बनवला तर महाराष्ट्रीयन असल्यामुळे या सोबत चपाती खाणे पसंद करतात काही जण घरीच बटर नान बनवत असतील देखील . पण मी बनवत नाही. शॉर्टकट मारण्यासाठी पनीर आणि चपाती बेस्ट. 

इ .स . १३०० मध्ये इंडो -पर्शियन कवी अमीर कुश्रवा यांच्या नोट्स मध्ये नान चा पहिला इतिहास नोंदवलेला सापडतो. हे मुळतः नान -ए -टुणूक (हलके ब्रेड ) आणि नान-ए -तनुरी (तंदूर भांड्यात शिजवलेले) म्हणून दिल्ली च्या इंपिरियल कोर्टात शिजवले गेले होते. नान  हा ओव्हनबेक केलेला फ्लॅटब्रेड आहे. नान हा पर्शिय भाषेचा शब्द आहे. नान हा प्रामुख्याने मध्य आशिया आणि दक्षिण आशिया मध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे. एका बटर नान मध्ये ९३ कॅलरी असतात. त्यांपैकी ५६ कॅलरी कर्बोदके देतात, ९कॅलरी प्रथिने आणि उरलेली २७ कॅलरी चरबीमधून येतात. एक बटर नान एका प्रौढ व्यक्तीच्या दररोजच्या आहारात लागणाऱ्या २००० कॅलरी मधील ५% कॅलरी देते.  

नान बनवायचे ९ प्रसिद्ध प्रकार आहेत. १) नवाबी नान २)बटर नान ३)रोगनि नान ४)चिली चीज नान ५)मसाला पनीर नान ६)काश्मिरी नान ७)चूर चूर नान ८)कीमा नान ९)एग नान 

नान बनवायच्या बऱ्याच पद्धती आहेत तसे नान भाजण्याच्याही पद्धती असतात . नान भाजण्यासाठी लोखंडाचा तवा वापरत असाल तर त्याला तवा बटर नान म्हणतात अर्थात नान ला बटर म्हणजे लोणी लावले जाते. जर तुम्ही नान भाजण्यासाठी तंदुर ओव्हन वापरत असाल तर त्याला तंदूर बटर नान असे म्हणतात.

तुम्ही बटर नान सोबत पनीर मसाला, पालक पनीर, पनीर कडाइ , मटार पनीर, पनीर टिक्का मसाला व्हेज हैद्राबादी, मश्रुम मसाला किंवा मश्रुम कडाइ इत्यादी पदार्थ खाऊ शकता अजूनही बऱ्याच भाजी सोबत तुम्ही बटर नां खाऊ शकता. 

चला तर !! बटर नान बनवूया !!



साहित्य : मैदा , बेकिंग सोडा , मीठ , दूध, दही , बेकिंग पावडर ,  बारीक रवा , साखर, कोथिंबीर  इत्यादी .



कृती :  एका पराती मध्ये अर्धा किलो मैदा चाळून घ्या. त्या मध्ये मीठ , बेकिंग सोडा , बेकिंग पावडर  टाका . नंतर साधारण १ मोठी वाटी दही घ्या त्यामध्ये १ मोठा चमचा रवा भिजवा. हे मिश्रण ५-१० मिनिटे तसेच झाकून ठेवा. एका भांड्या मध्ये २ कप दूध गरम करा त्यामध्ये १ चमचा साखर विरघळत ठेवा .



आता रवा भिजवलेले मिश्रण पिठात ओता . ते संपूर्ण पिठामध्ये मिसळून घ्या . नंतर साखर विरघळवलेले दूध थोडे थोडे घालून घट्ट कणिक मळा .



जर पीठ अजून कोरडे वाटत असेल तर गरम दूध घालून सर्व पीठ मळून मऊ होईपर्यंत घोळून घ्या .

मळलेल्या पिठाच्या गोळ्यावर सुती  भिजवलेले कापड टाका . हे पीठ शक्य असल्यास गरम जागेत ठेवा.
साधारण १ तास पीठ भिजवल्या  नंतर नान बनवायला  घेऊ  शकता.



नान बनवण्यासाठी :


प्रथम सर्व पिठाचे गोळे बनवून ठेवा. गोळे साधारण चपातीच्या गोळ्या पेक्षा थोडे  लहान असायला पाहिजे.

पोळपाटावर मैद्याच्या गोळ्याची चपाती मैदा लावून लाटा . चपाती जास्त पातळ लाटू नये व जास्त जाड हि ठेऊ नये . चपातीच्या एका बाजूला काळे तीळ व कोथिंबीर घालून लाटण्याने दाबून घ्या . नंतर चपाती उलटी करून त्याला दुसऱ्या बाजूने मिठाचे पाणी लावा.
लोखंडाचा तवा तापवायला ठेवा . तवा तापला कि त्यावर पाण्याची बाजू तव्यावर येईल अश्या पद्धतीने नान तव्यावर टाका . थोड्याच वेळात नानला वरच्या बाजूला फुगे (बबल्स ) येतील व खालील बाजू भाजली जाईल. नंतर तवा उचलून गॅसवर उलट धरून नान  भाजा . भाजलेली नान तव्यावरून काढा आणि त्याला बटर  लावा.


टीप १ : बेकिंग सोडा नसेल तर इनो वापरू शकता. बेकिंग पावडर ऑपशनल आहे.   तव्याला कोणत्याही  प्रकारचे तेल , बटर लावू नये . नान  ला एका बाजूने पाणी लावले कि नान  तव्याला चिटकून बसते व दुसऱ्या बाजूने गॅसवर तवा  उलट धरून भाजता येते.


टीप २: गार्लिक बटर नान साठी लसणाचे छोटे छोटे तुकडे नान ला लावून त्यावर काळे तीळ , कोथिंबीर घालून लाटण्याने प्रेस करावे व वरील प्रकारे नान भाजावे. 

  तवा बटर नान

या प्रमाणे नान तवा उलट धरून गॅसवर भाजणे 


तुम्ही हि रेसिपि नक्की करून पहा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया खाली असलेल्या कंमेंटबॉक्स मध्ये लिहून कळवा. 

धन्यवाद !

Saturday, 9 May 2020

परवलीचा शब्द

आई .... सांग ना  वीरा दि ला ? अगं ही  मला तिच्या फोन चा पासवर्ड सांगत नाही.
मला आपले काल बर्थडे पार्टी मध्ये  काढलेले फोटो पाहायचे आहेत. 

जोर जोरात ओरडून आई कडे तक्रार करणारा विनू वीराचा मोबाईल फोन घेऊन आईच्या दिशेने पळत सुटला होता. सकाळची वेळ होती.... वीरा अजून अंथरुणातच लोळत पडली होती. आजी देवघरात देवपूजेत मग्न होती आणि आई स्वयंपाक घरात नाश्ता बनवण्यात गढून गेली होती. वीराचे बाबा ऑफिस ला निघून गेले होते. 
धावणाऱ्या विनूला मधेच थांबवत आई म्हणाली ...

काय रे विनू लहान आहे का तुम्ही ? सकाळी सकाळी किती गोंधळ करता....  आई . 

आई सांग ना ग त्याला माझा फोन घेतला आहे विनूने.... वीरा. 

विनू कशाला घेतला आहे तिचा फोन ? आई 

तिनी फोन ला किती पासवर्ड घातले आहेत बघ ना ? विनू 

तुला रे काय करायचं आहे ? वीरा 

मला काल झालेल्या बर्थडे पार्टीचे फोटो बघायचे आहेत . विनू 

मी दाखवते तुला !! दे माझा फोन.... वीरा 

नाही !! मला पासवर्ड सांग आधी ? विनू 

विनू आर  यु मॅड ? पासवर्ड काय सांगण्या साठी घालतात का ? ..... वीरा 

आई बघ ना! दीदी कशी बोलते. मी काय हिचा डेटा चोरी करणार आहे का ? विनू 

शांत बसा रे दोघे पण ! सकाळी सकाळी काय पासवर्ड पासवर्ड लावलं आहे . आई 

सर्व गोंधळ ऐकून देवघरातून बाहेर येणारी आजी हातावर लाडूचा प्रसाद टेकवत म्हणाली . बाळांनो काय झालं? का बरे भांडण करत आहे ?

त्यावर विनू आजीचा लाडका लगेच आजीच्या पाठी लपत बोलला बघ ना अगं आजी दीदी मला तिच्या फोन चा पासवर्ड सांगत नाही.

आता धार्मिक असलेली आजी फारशी शिकलेली नव्हती त्यामुळे कदाचित तिला यांचं नेमकं कशावरून भांडण चालू आहे हे कळतं नव्हतं. 

बरं या गोष्टी वर आपण नंतर बोलूया ! आधी विनू तू वीराचा फोन तिला परत कर  . असे बोलून आजीने वाद थांबवला . फोन मिळताच वीरा विनूला वाकुल्या दाखवत आपल्या खोलीत निघून गेली. आपली बाजू कोणीही घेतली नाही असे समजून ओशाळलेला विनू बागेत जाऊन बसला. सर्वांचं काम आटोपल्यानंतर दुपारचं जेवण झालं. गर्मीचे दिवस असल्यामुळे सर्व मंडळी बागेत आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसली. आजी आणि आई शेंगा फोडत बसल्या होत्या . वीरा फोन मध्ये गुंग झाली होती. विनू फारसा बोलत नव्हता. सकाळी झालेला प्रकार त्याला रुचला नसल्यामुळे तो अजून त्याच भानात होता. 

आता आजीने विनूकडे पाहून सकाळी झालेला प्रकार विचारायला सुरुवात केली. विषय निघताच विनूची कळी खुलली आणि तो हि कान टवकारून ऐकू लागला. आजी मुद्दाम आईला विचारू लागली . 

 काय गं ! सकाळी काय गोंधळ चालला होता. आजी 

आईने हि आज्ञाधारक सुने प्रमाणे तिची सेवा बजावत झालेला सर्व प्रकार अगदी जसाच्या तसा सांगितला. आता आजी प्रश्न विचारणार पक्क होत. 

वीरा कसला पासवर्ड टाकला आहेस फोन ला ? आजी 

काही नाही ग आजी ? वीरा 

वीराने विषय टाळण्यासाठी उत्तर दिल आणि पुन्हा फोन मध्ये डोकं घालून बसली. 

मग आजी म्हणाली आम्ही म्हातारी माणसं आम्हाला काय कळतंय या फोन मधलं . पण माझ्या एवढे म्हातारे लोक सुद्धा  फोन वापरतात . मी पहाटे फिरायला जाते तेंव्हा बरीच मंडळी गळ्यात फोन अडकून फिरायला येतात. 
हे ऐकून वीरा आणि विनूला आजीची गम्मत वाटली आणि त्यांना आपली आजी आता या मोबईल फोन आणि पासवर्ड बद्दल खडा न खडा माहिती घेणार त्यांना कळून चुकले.

आजीचा  नवीन जगात काय चाललं आहे हे जाणून घेण्याचा नेहमीच अट्टाहास असतो. ती तिच्या अध्यात्मकतेच्या गोष्टी जश्या आम्हाला सांगते तशात नवीन तंत्रज्ञानाच्या गोष्टीही ती आमच्याकडून आत्मसात करत असते .

मग ती पुढे बोलू लागली . आमच्या काळात असे फोन वगैरे नव्हते. आम्ही आमची खुशाली पत्र लिहून कळवत. त्यासाठी बरेच दिवस लागत. मग त्यांचा संदेश येईपर्यंत बरीच वाट पाहावी लागायची . पण आता हे काम अतिशय सोपं झालं आहे या मोबाईल फोन द्वारे. क्षणाचा ही  विलंब न करता सर्व काही घरात बोलल्या प्रमाणे समोरच्याला आपण आपलं बोलणं सांगू शकतो आणि तो हि लगेच त्यावर प्रतिउत्तर देतो. काय म्हणायचं या मोबाईल फोन ला . हा तर साक्षात गणपतीने मानवाला दिलेला प्रसाद असावा .  ती तिच्या आध्यात्मकतेच्या गोष्टीला अनुसरून बोलू लागली.

रुसून बसलेला विनू आता त्याचा अबोला सोडून बोलू लागला....

आजी हा गणपतीचा प्रसाद नाही ग ! मोबाईल फोन हा मानवानेच तयार केला आहे. आधी पत्राद्वारे संभाषण करत असताना खूप वेळ खर्च व्हायचा पण या मोबाईल फोन मुळे आता खूप वेळ वाचतो आणि आपण हा मोबाईल कुठेही घेऊन जाऊ शकतो . आता हे तर तुला नव्याने सांगायला नको . तुला माहित आहे कि हे! मी सांगितलं आहे तुला आधी !!

फोन मध्ये व्यस्त असलेली वीरा आता आजीला नेमकं काय जाणून घ्यायचं आहे हे समजून म्हणाली ...
अरे विनू आजीला पासवर्ड म्हणजे काय ? हे जाणून घ्यायचं आहे . तू आता तिला मोबाईल च काय सांगत आहेस ? ते तिला माहिती आहे .

मग आजीने हि आता भोळेपणाचे सोंग सोडून थेटच विचारलं ...

काय आहे हा पासवर्ड ? आजी

त्यावर वीरा म्हणाली पासवर्ड म्हणजे एक गुपित कोड असतो किंवा पॅटर्न असतो आपली माहिती चोरी होऊ नये म्हणून तो मोबाईल फोन मध्ये टाकला जातो . म्हणजे तुमचा फोन सुरक्षित राहतो.

आजी गोंधळून गेली तिला वीरा च बोलणं कळालं नव्हतं. तिचा गोंधळलेला चेहरा आणि चेहऱ्यावरील प्रश्नचिह्न पाहून विनू म्हणाला.

पासवर्ड म्हणजे परवलीचा शब्द !!

हे ऐकताच आजी म्हणाली परवलीचा शब्द !! तो तर शिवाजी महाराज्यांच्या काळात गुप्तहेर वापरायचे. शत्रूच्या छावणी मधील गुपित माहिती काढून पुढे महाराजांच्या गडावर सुरक्षित पोहचावी म्हणून परवलीचा शब्द वापरायचे.

पण मोबाईल फोन मध्ये परवलीचा शब्द वापरायला मोबाईल फोन मध्ये पण शत्रूचे गोठ आहेत का ? आजी हसत हसत बोलली .

त्यावर वीरा म्हणाली अगं आजी ! मोबाईल फोन चे जसे फायदे आहेत तसे दुष्परिणाम सुद्धा आहेत. मग हा परवलीचा शब्द कामाला येतो बघ ! वीरा

तो ग अन कसा ? नीट  समजेल अश्या भाषेत सांग कि ?  आजी

हे बघ ! आता बाबा आपल्या घरी बसून टीव्ही चे , फोन चे , विजेचे बिल मोबाईल फोन वरून भरतात कि नाही ? विनू

हो रे आज काल तो  घरीच बसून ऑनलाईन का बिनलाईन म्हणतात तसाच बिल भरतो . आजी

तेच ग ! ऑनलाईन बिल भारतात म्हणजेच फोन मधून ते डायरेक्ट त्यांच्या बँकेच्या खात्या मधून पैसे काढून वीज कंपनी , मोबाईल कंपनी ला देतात आणि बिल भरतात. त्याची पावती सुद्धा मोबाईल मध्ये मिळते. विनू

मग जर तुमच्या बँकेच्या खात्याचा तपशील दुसऱ्या कोणाच्या हाती लागला तर ... वीरा

बापरे ! कोणीही आपल्या परस्पर आपल्याच खात्यातून पैसे काढून घेऊ शकते . आई

म्हणून परवलीचा शब्द उपयोगी आहे . तो फक्त आपल्यालाच माहित असणार . परवलीचा शब्द असेल तर तुमच्या खात्याचा तपशील कोणीही घेऊ शकत नाही . विनू

आता हे झालं बँकेचं ! असे बरेच ऑनलाईन व्यवहार असतात ज्या मध्ये तुम्हाला तुमचा परवलीचा शब्द वापरून काम करायचं असत . वीरा

 लॅपटॉप, कॉम्पुटर किंवा मोबाईल या वस्तू मोठ्या मोठ्या कंपनी मध्ये काम करणाऱ्यांना कंपनी तर्फे मिळतात. त्या वस्तू  फक्त त्यांनी कंपनी च काम करण्यासाठीच वापरायच्या असतात . त्याला सुद्धा परवलीचा शब्द असतो . कंपनी ची माहिती बाहेर दुसऱ्या कंपनी ला कळू नये यासाठी घेतलेली ती खबरदारी असते.  विनू

किती महत्वचा आहे परवलीचा शब्द !! आई

आणि शत्रूच म्हणशील तर या मध्ये शत्रूच नाव आहे हॅकर ! विनू

शिवाजी महाराजांच्या काळात शत्रू बरेच होते त्यांची उघड लढाई होत असे . आदिलशाही, निजामशाही आणि मोघलाई हे त्यावेळचे शत्रू होते. पण आता या मध्ये शत्रू आहेत हॅकर . हे हॅकर तुमच्या आमच्या सारखीच माणसं  असतात. त्यांना आपण ओळखू शकत नाही. छुप्या रीतीने ते आपला परवलीचा शब्द चोरून आपले पैसे ढापू शकतात. सोसिअल मीडिया वर आपली बदनामी करू शकतात. असे अजून बरेच गैरप्रकार करू शकतात . असे करण्यासाठी त्यांना पैसे मिळतात. वीरा

सोशिअल मीडिया म्हणजे ? आजी

सोशिअल मीडिया म्हणजे असे अँप्लिकेशन असतात जे वापरून  दूर देशातील लोकांनसोबत तुम्ही मैत्री करू शकता त्यांच्या सोबत गप्पा मारू शकता. तुम्ही तिथे काय चाललं आहे हे विडिओ कॉल करून बघू शकता. असे करण्या साठी तुम्हाला इंटरनेट सोबत कनेक्ट असले पाहिजे . विनू

अग! आपण आत्यासोबत नाही का इथे बसून बोलत ते. ती आपल्याला व्हाट्सअप कॉल करते. ते म्हणजे सोसिअल मीडिया . या सोशिअल मीडिया मुळे आपण जगाशी जोडले जातो . वीरा

पण याला कशाला परवलीचा शब्द लागतो. आजी

आता समजा मी वीरा दीदीला काही माझं गुपित सांगत असेल , काही महत्वाच्या कागतपत्रांचा फोटो तिला पाठवला असेल आणि तो गुपित ठेवायचा असेल तर परवलीचा शब्द वापरून मी तो गुपित ठेऊ शकतो. विनू

असं आहे तर ! आजी

पण मग फोटो साठी कशाला परवलीचा शब्द वापरला आहेस तू वीरा आणि तो पण विनू साठी ?

मी विनू साठी च म्हणून नाही वापरला . मी कॉलेज मध्ये जाते तिथे माझे खूप सारे मित्र-मैत्रिणी आहेत . कोणी चुकून माझा मोबाईल फोन घेऊन फोटो पाहिले. माझ्या फोन मधून माझे फोटो चोरी करून त्याचा गैरउपयोग केला तर ! कोण चांगलं आणि कोण वाईट हे तोंडावर लिहिलं नसत . सर्वात जवळचे लोकच फसवत असतात असे आपण बऱ्याच टीव्ही मालिकेत पहिले आहे. त्यासाठीची हि खबरदारी हवं तर समज. वीरा

पण दीदी मी तर यातलं काहीच करणार नव्हतो . तू मला पासवर्ड का नाही सांगितला ? विनू
अरे परवलीचा शब्द कोणाला सांगण्यासाठी असतो का ? आजीला विचार महाराज्यांच्या काळात त्याला किती महत्व होत ? वीरा

हो ग ! पण विनू आपलाच आहे. आजी

तसं नाही ग विनू लहान आहे आणि त्याला माझा परवलीचा शब्द कळला तर तो त्याच्या न कळत माझा  कोणताही महत्वाचा डेटा डिलिट करू शकतो . पॉप उप होणाऱ्या संदेशांना रिप्लाय करू शकतो . वीरा

बरं ठीक आहे तुला अजून १ परवलीचा शब्दाचं सांगतो . या वरून बरेच लोकांची भांडण होतात. आता दीदीच आणि माझंच बघ ना झालं ना भांडण ? असच   पासवर्ड सांगत नाही म्हणून भांडण होतात . कधी कधी हि भांडण इतकी विकोपाला जातात कि घटस्फोट सुद्धा होतात . प्रत्येकाला स्वतःची privacy महत्वाची आहे . विनू

मग ते पॅटर्न च काय म्हणत होती तू ? कसला पॅटर्न असतो ग वीरा ? आजी

परवलीचा शब्द  खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ते तुम्ही आकडे, शब्दात किंवा पॅटर्न मध्ये ठेऊ शकता . लॅपटॉप किंवा मोबाईल फोन मध्ये ते आकडे , शब्द किंवा आकृतीच्या (पॅटर्न ) च्या स्वरूपात असतात . संशोधन केंद्रामध्ये एखाद्या खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी सुद्धा परवलीचा शब्द असतो. तो आकडे , आकृती , शब्द,  हाताचा पंजा, अंगठ्याचा ठसा, डोळे किंवा अख्खा चेहरा हे परवलीचा शब्द म्हणून वापरतात. वीरा

डोळे, चेहरा ,हाताचा पंजा हे कसं काय ग परवलीचा शब्द असेल ? आजी

अग आता हॅकर्स इतके हुशार आहेत कि ते आकडे, आकृती आणि शब्द लगेच चोरू शकतात. म्हणून हाताचा ठसा, अंगठ्याचा ठसा किंवा डोळ्याचे बुबुळ आणि चेहरा हे सहज चोरू शकत नाही म्हणून हे सुद्धा परवलीचा शब्द असतात. यालाच बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन असं म्हणतात . विनू

आणि हो तुमचा आवाज हा सुद्धा परवलीचा शब्द म्हणून वापरू शकता. वीरा

बापरे ! काय हि प्रगती झाली आहे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये !! आजी

आजी ! हे  काहीच नाही अजून बरच काही आहे . पण आज साठी एवढं पुरे आहे !

चला आता ४ वाजले चहा पिऊया ? आई 

हो ग ! कसा वेळ गेला कळलंच नाही . आजी 

सर्वजण चहा प्यायला  निघून जातात . पण काय मंडळी तुम्ही तुमचा परवलीचा शब्द गुपित ठेवत आहे ना ? 

बँक मधून येणाऱ्या फोन वरून तुम्ही तुमची माहिती सांगत तर नाही ना ?  अश्या कोणत्याच कॉल ला प्रतिउत्तर देऊ नका. ऑनलाईन व्यवहार करत असाल तर तुम्ही तुमचा परवलीचा शब्द सारखा सारखा बदलत रहा . 

अलर्ट रहा ! सावध रहा !

धन्यवाद ! 















Wednesday, 6 May 2020

सोयाबीनचे व्हेज कबाब


आज सोयाबीनचे व्हेज कबाब ब्रेकफास्ट ला बनवशील का? मी माझ्या मित्राच्या घरी खाल्ले आहेत. खूप छान चव होती . असे बोलून वैभव त्याच्या खोली मध्ये निघून गेला.  वैभवची आई  मात्र स्वयंपाकघरात काहीतरी कामात व्यस्त होती. ती कोणत्या तरी विचारात असावी. तिनी त्याची मागणी ऐकली होती पण त्याकडे तिचे लक्ष्य नव्हते. कदाचित कामामुळे थकून गेली असावी. वैभव थोड्या वेळाने अंघोळ आटपून स्वयंपाक घरात आला आणि त्याने ग्लास वाजवून आईला भानावर आणले.

काय गं ! कसला विचार करत आहेस? वैभव

काही नाही रे ! आई


अगं सांग ना ? कसल्या विचारात आहेस? वैभव


अरे ! आपण रोज जेवण बनवतो त्यामध्ये कोणते पोषण तत्व असतात आपल्याला माहित नसते. आपण रोज ठराविक भाज्या बनवतो आणि त्या खातो . पण त्या भाजी पासून आपल्या शरीराला कोणते घटक उपयुक्त आहेत हे कोणालाच माहित नसते . किमान मला तरी माहित नाही. आई


हो ग! तुझं अगदी बरोबर आहे . वैभव


आणि अरे तुम्ही मुलं आजकाल हॉटेल्स मध्ये नवीन पदार्थ खाता आणि घरी येऊन तेच पाहिजे मागणी करता. आई


रोज त्याच त्याच भाज्या खाऊ वाटत नाहीत.  बोअर होत ग ! ट्राय समथींग न्यू मॉम !! 


असं  बोलून वैभव निघून गेला. वैभव ची आई मात्र अजून विचारात होती. या मुलांना त्याच भाज्या फक्त नवीन पद्धतीने खाण्यास दिल्या कि त्यांना त्या स्पेसिअल वाटत असतात.
वैभव ची आई आता सोयाबीन या विषयात गढून गेली. तिला ४ च्या चहा सोबत सोयाबीन चे कबाब बनवायचे होते ना !


सोयाबीन ! याचे शात्रीय नाव आहे  ग्लिसाइन  मॅक्स.  जगातील सोयाबीन चे ६०% उत्पादन तसे तर अमेरिका मध्ये होते. आणि भारताचं म्हणाल तर सोयाबीन हि कडधान्य मध्य प्रदेशात जास्त पिकवल जात . तुम्हाला माहिती आहे का ? भारतामध्ये सोयाबीनचे रिसर्च सेंटर सुद्धा आहे. मध्य प्रदेश मध्ये इंदूर या गावी आहे ते ! 


कडवटपणा दूर करून सोयाबीन ची कणीक वापरून पोळ्या, ब्रेड बिस्कीट, नानकटाई इत्यादी पदार्थ बनवता येतात. सोयाबीनची डाळ हि शेव, चकली व मिसळ बनवण्यासाठी उपयुक्त आहे. सोयाबीनचे खाद्य तेल आपण वापरत आहेच . या तेलाच्या बऱ्याच जाहिराती तुम्ही टीव्ही वर सुद्धा पहिल्या असतील. सोयाबीन पासून बायोडिझेल , पेंढ तयार केली जाते. आता आज सोयाबीनचे व्हेज कबाब सुद्धा बनणार आहेत बरं  का !

 सोयाबीन मध्ये ३८-४०% प्रमाणात प्रोटीन असतात जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतात. शरीराचा घेर कमी करतात. २१% कार्बोहाइडेंट असतात जे उच्च रक्त दाब रोखण्यासाठी कारणीभूत आहे.  लेसिथीन हे स्मरणशक्ती वाढवणारा घटक सोयाबीन मध्ये असतो . तसेच व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी, लेक्टिन, फायबर इत्यादी पोषक घटक सोयाबीन मध्ये असतात. सोयाबीन मध्ये असणारे आयसोप्लेबोंस नामक रसायन शरीराचा ऑस्टीयोपोरोसीस या व्याधीपासून बचाव करण्यास सहायक आहे. लहान मुलांच्या योग्य शारीरिक विकासासाठी तसेच नखांची व केसांची  वाढ नीट होत नसल्यास आहारामध्ये सोयाबीनचा समावेश करावा. फिट्स येत असल्यासही सोयाबीनच्या सेवनाने गुण येऊ शकतो. यामध्ये असलेले मॅग्नेशियम शांत निद्रा येण्यास सहायक आहे.
 बापरे !!!  किती सारे उपयुक्त गोष्टी आहेत या सोयाबीनच्या. तुम्हीही नक्की सोयाबीनचा उपयोग तुमच्या आहारात करा.

अरे देवा !. ३.३० वाजले वैभव येईल आता मला सोयाबीनचे व्हेज कबाब बनवायचे आहेत.

साहित्य : सोया चंक (सोयाबीनचे गोळे) , २ मध्यम आकाराचे कांदे, २-३ मिरच्या, २ इंच लांब आल्याचा तुकडा, ६-७ लसूण पाकळ्या, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, जिरे पूड, काळी मिरे पूड, धने पावडर, मीठ, हळद, मैदा, कॉर्न फ्लोअर किंवा आरारोट(तांदूळ ३ दिवस भिजवून दळलेले तांदळाचे पीठ ), तेल इत्यादी .

कृती : प्रथम सोयाबीनचे गोळे (सोया चंक) गरम पाण्यात भिजत ठेवा म्हणजे ते मऊ होतील. तोपर्यंत मिक्सर च्या भांड्या मध्ये  २ मध्यम आकाराचे कांदे, २-३ मिरच्या, २ इंच लांब आल्याचा तुकडा, ६-७ लसूण पाकळ्या, कोथिंबीर/कढीपत्ता हे सर्व बारीक करून पेस्ट बनवा. सोयाबीन मऊ झाले असतील तर पाण्यातून पिळून काढा. सोयाबीन पाण्यातून काढताना शक्य तेवढे पाणी पिळून काढा म्हणजे मिश्रण पातळ होणार नाही. आता पिळून काढलेले सोयाबीनचे गोळे मिक्सर मध्ये पेस्ट केली आहे त्यामध्येच  घालून तसेच बारीक करा. म्हणजे कांदा  लसूण आलं यांच्या सोबत सोयाबीन छान बारीक होईल. आता बारीक केलेली पेस्ट एका भांड्यात काढून घ्या.  त्या पेस्ट मध्ये  लाल मिरची पावडर, चमचा जिरे पूड, काळी मिरे पूड, धने पावडर, मीठ, हळद, मैदा, कॉर्न फ्लोअर किंवा आरारोट(तांदूळ ३ दिवस भिजवून दळलेले तांदळाचे पीठ ) तुमच्या अंदाजाने घाला. कारण सर्वांची पद्धत व चव वेगळी असते. ते मिश्रण हाताने छान हलवून घ्या. आता कढई मध्ये तेल गरम करण्यासाठी  ठेवा. तेल गरम होईपर्यंत तुमच्याकडे कबाब बनवण्यासाठी रॉड असेल तर ठीक नसेल तर शिसपेन्सिल वर हि तुम्ही कबाब बनवू शकता . शिसपेन्सिल घ्या ती पाण्याने ओली करा . तुमचा हात पाण्यात बुडवून घ्या व पेस्ट चा गोळा करून पेन्सिलीभोवती उभ्या आकारात गोलाकार लावा मधून मधून पाण्याचा हात घेऊन  आकार द्या नंतर अलगत पेन्सिल काढून घ्या . तयार झालेला कबाब मध्यम आचेवर तळून घ्या. अश्या प्रकारे बाकीचे पीस बनवा व तळून घ्या. हे कबाब तुम्ही टोमॅटो सॉस, शेजवान चटणी किंवा चिंचेची चटणी सोबत खाऊ शकता.

टीप : मिश्रण जर पातळ होत असेल तर मैदा किंवा कॉर्न फ्लोअर चे प्रमाण वाढवू शकता. तुमच्या कडे कॉर्नफ्लोअर नसेल तर बेसन पीठ वापरू शकता. कबाब शक्य तेवढा मंद किंवा मध्यम आचेवर भरपूर वेळ टाळून घ्या म्हणजे आतून तो नीट भाजेल. 




सोया चंक 

 सोयाबीन कबाब 

रेसिपिसाठी फक्त अर्धा तास लागतो तुम्ही नक्की घरी बनवा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. 

धन्यवाद !

Tuesday, 5 May 2020

र्गुरुर्देवो महेश्वरः

प्रत्येक जण शाळे मध्ये असताना हा गुरु मंत्र म्हणत असतो पाठही  असतो आणि जस जस मोठं होतो तस तस याचा आपणाला विसर पडतो. कारण सर्व जण शाळा सोडल्यानंतर पुढे कॉलेज , नोकरी , व्यवसाय, घर आणि संसार यामध्ये व्यस्त होऊन जातो . मग या मंत्रांची आपल्याला गुरु पौर्णिमा आणि शिक्षक दिन म्हणजे वर्षातून दोन वेळा  लोकांनी व्हाट्सअप वर ठेवलेले स्टेटस पाहून पुन्हा आठवण येते . काय बरोबर आहे ना ?
 ५ सप्टेंबर या  दिवशी साजरा होणारा शिक्षक दिन यावरून आज मला काही वास्तव तुम्हाला सांगायचं आहे  जे मी माझ्या जीवन प्रवासात अनुभवलेलं आहे. 

शिक्षक म्हणल  कि आपल्याला गणिताचे,मराठीचे, विज्ञानाचे, इतिहास-भूगोलाचे शिक्षक आठवतात. त्यासोबत त्यांनी मारलेल्या छडया आणि दिलेला चोप सुद्धा अजून आठवतो. खरंच शिक्षकांना किती घाबरायचो आपण ? काही शिक्षक कडक स्वभावायचे म्हणजे शिस्त-प्रिय आणि काही शिक्षक मृदू स्वभावाचे म्हणजे हसत खेळत शिकवणारे . त्यामुळे शिक्षकांचं महत्त्व कायम माझ्या मनात वेगळं होत. तुम्हाला आठवत ! प्रत्येक जण शाळेत असताना तुम्हाला नेहमी १ प्रश्न विचारला जायचा, तुम्ही मोठे झाल्यावर कोण बनणार ? शाळेत असतानां बाहेरील जगाचा अनुभव नसतो आणि आपण उत्तरे देतो ,मी डॉक्टर बनणार, इंजिनिअर बनणार, वकील बनणार, संशोधक बनणार etc . आता मला इतकं हसू येत हे आठवलं कि कारण माझ्या वर्गातील सर्वच जण असच उत्तरे द्यायची.

आमचा मराठीचा तास चालू होता आणि मराठीचे शिक्षक आम्हाला यशवंतराव चव्हाणांचा  धडा शिकवत असताना १ वाक्य आलं मी मोठेपणी यशवंतराव चव्हाणच बनणार . त्या नंतर आमच्या शिक्षकांनी मधेच शिकवणं बंद केलं आणि प्रश्न विचारला, मुलांनो ! तुम्ही मोठे झाल्यावर कोण बनणार ? एक एका विद्यार्थ्याने उभे राहून सांगायचं असल्यामुळे वर्गात चुळबुळ चालू झाली. आम्ही ५-६ जणी बेंच जोडून सलग बसणाऱ्या ग्रुपचं एकच काम चालू झालं . कोण काय सांगत आहे ऐकायचं आणि तो हुशार असेल तर ठीक! पण अभ्यासात ढ असेल, तर त्याच ऐकायचं आणि डॉक्टर, वकील,  इंजिनीअर म्हणालं  कि जोरात हसायचं . आपली मैत्रिण काय सांगत आहे हे ऐकायचं आणि हसायचं असा उद्योग चालू होता माझा. बघता बघता माझ्यावर नंबर आला मी उठून उभा राहिले आणि पटकन काही सुचेना म्हणून मीही इंजिनीअर बनणार असं बोलले. तेंव्हा आमचे शिक्षक असं म्हणाले होते कि शिक्षक कोणालाच बनायचं नाही का? याची मला खूप खंत वाटत आहे आणि दुर्दैव हि !!! आज या घटनेला बरीच वर्षे उलटून गेली आहेत पण माझ्या शिक्षकांचे ते वाक्य अजूनही जसेच्या तसे माझ्या कानावर पडत असल्याचा भास होतो.  

मी आज खरोखरच इंजिनीअर आहे याचा मला अभिमान आहे पण त्याहून जास्त अभिमान अजून एका गोष्टीचा वाटतो कि मी शिक्षिका देखील आहे. कदाचित सर असते तर त्यांची हि खंत दूर झाली असती. असो!
 शिक्षक या घटकाकडे  बघण्याचा दृष्टिकोन सर्वांचा वेगळाच आहे. 

काही लोकांच्या म्हणण्यानुसार... 
शिक्षकांना काय काम असतात ? अहो सावलीला बसून पगार असतो त्यांना !
 मुलांन  समोर जाऊन काही तरी १ तास बडबडून यायचं ! दिवसातून २-३ तास शिकवलं कि झालं हो नंतर दिवस रिकामा बसून काढायचा ! मुलांना काय कळतंय ? काही कीर्तनकार तर शिक्षकांनवर बेधडक विनोद करतात. 

काही लोक म्हणतात शिक्षक म्हणजे जीवनाचा शिल्पकार असतो. शिक्षक नेहमी तुमच्या चांगल्या गोष्टीं साठीच शिकवत असतात. शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचे तुम्ही मूल्य करू शकत नाही.

दोन्हो लोकांची मते तपासून पहिली तर तशी दोन्ही बरोबरच आहेत !!

हो!! शिक्षक जीवनाचा शिल्पकार तेंव्हा होता जेंव्हा शिक्षणाचा बाजार झाला नव्हता . तो तुम्हाला विना मूल्य भरगोस ज्ञान वाटत असे जेंव्हा विद्यार्थ्यांना ते खरंच  हवं असे. शिक्षक सावलीला बसून पगार घेतो आणि १-२ तास बडबड करून निघून जातो कारण आता विद्यार्थी शिक्षकांचा मान ठेवत नाहीत , त्यांना शिस्त लावण्याची सोय राहिली नाही . म्हणून विद्यार्थी झाले कस्टमर आणि शिक्षक झाले आहेत व्यवसायिक. 

शिक्षकांच्या या परिस्थीला कुठेतरी आपणच जबाबदार नाही का हो ? 
आज आपल्या मुलाला शिक्षकांनी मारलं किंवा छड्या दिल्या कि लगेच तुम्ही शिक्षकांच्या अंगावर धावून जाता. का मारलं ? का शिक्षा केली? काहीही विचारत नाही ? 

आमच्या वेळी शाळेत आगाऊपणा केला कि शिक्षक  बेदम मारायचे वरून घरी सांगायची सोय नाही घरचे सुद्धा येऊन बिनधास्त सांगायचे काही आगाऊपणा केला कि अजून मार द्या आम्ही काहीही विचारणार नाही. सुदैवाने माझ्यावर असली वेळ कधी आली नाही पण मुलांच्या बाबतीत नेहमी घडायचं. तेंव्हा असं काही गंभीर गुन्हे शिक्षकही करत नव्हते  आणि पालकांनाही जाब विचारायची वेळ यायची नाही . पण आता परिस्तिथी बदलली आहे. 

आजच्या परिस्तिथीत शिक्षक , पालक आणि विद्यार्थी तिन्ही घटक गुन्हेगार झाले आहेत. आपण अनेक बातम्या बघतो वाचत असतो त्यावरून समजतं. मला आता यावर अधिक विस्ताराने नाही बोलायचं कारण विषय फार मोठा होईल. तर माझ्या मुद्द्यावर येते.

मी इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये प्रोफेसर आहे. आता अर्थातच तुम्हाला कल्पना आली असेल कि हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं कसे असेल! इंजिनीअरिंग म्हणाल तर खूप अभ्यास असतो खूप प्रात्यक्षिके करावी लागतात आणि खूप परीक्षा हि असतात. 

माझा आज पहिलाच दिवस होता इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये शिकवायला जाण्याचा आणि अर्थात नोकरीचा. मी वर्गात गेले ,  सर्व जण गोंधळ घालत बसले होते मला पाहताच कोणी नवीन मॅडम आल्या आहेत पाहून सर्वांनी कंमेंट्स करायला सुरवात केली. मी माझे शिक्षण मोठ्या कॉलेज मधून पूर्ण केल्यामुळे मला इंजिनीअरिंग च्या   विद्यर्थ्यांना  शिकवण्याचा आत्मविश्वास होताच तसेच माझे कम्मुनिकेशन चांगले असल्यामुळे मला तो वर्ग पटकन शांत करता आला . मी पहिल्या दिवसा पासून शिकवायला सुरुवात केली होती . माझा तास संपला ,नंतर मी माझ्या केबिन मध्ये जाऊन बसले. खूप थकल्यासारखं वाटू लागलं होत.  मला वाटलं मला जमेल का ?हे मी स्वतःबरोबर बोलू  लागले.

किती मोठी मुलं  आहेत हि ? मी

मग असूदेत मी काही कमी नाही . माझ्यातील शिक्षक

ते कंमेंट्स पास करत होते कसं वाटत होत ? अक्षरशः रडू येत होत? मी

पहिलाच दिवस आहे त्यामुळे!! तू जर तुझ्या शिकवण्याच्या पद्धतीने त्यांना आकर्षित केलं तर नाही करणार ते कंमेंट्स.  माझ्यातील शिक्षक

हो पण १ तास सलग बडबड करायची खूप दम लागतो मला ? मी

होईल सवय आत्तापर्यंत बेंच वर बसून ऐकायची सवय होती आता पात्र बदललं आहे . माझ्यातील शिक्षक

मला जमेल हे ? मी

का नाही ? माझ्यातील शिक्षक

असं स्वतः सोबतच माझं संभाषण चालू असताना मे आय कम इन मॅम  ? असा आवाज येऊन मी भानावर आले .  मघाशी मी ज्या वर्गात तास घेतला होता त्या वर्गातील अक्षय नावाचा मुलगा होता . तो मला सांगायला आला होता कि मॅडम तुम्ही खूप छान शिकवत आहे. आम्हाला या आधी असं कोणीच शिकवलं नाही. मी थँक यु म्हणून तुला काही अभ्यासात शंका असेल तर विचार असं सांगून दिल .

लंच ब्रेक झाला मी माझ्या सोबत असलेल्या बाकीच्या शिक्षकानं सोबत डब्बा खायला बसले . जेवताना आमचा विषय चालू झाला . १ मॅडम म्हणाल्या मॅडम  आज पहिलाच दिवस ना ? मी  होकारार्थी मान हलवली . त्या सांगत होत्या मॅडम हि मोठी मुलं इंजिनीअरिंग आली म्हणजे त्यांना शिंगे येतात.  शिक्षक म्हणजे त्यांना काय वाटत त्यांनाच ठाऊक .तासाला बसायचं नाही , कंमेंट्स पास करायच्या, उलट उत्तरे द्यायची,  काही बोललं कि विभाग प्रमुखाकडे तक्रार द्यायची कि या मॅडम च आम्हाला शिकवलेलं समजत नाही. मग जाउद्यान कशाला आपण तरी मन लावून शिकवा. pass out झाले कि समजेल नोकरीची काय परिस्तिथी आहे .त्यांच्या बोलण्याला साथ देत दुसऱ्या मॅडम म्हणाल्या अहो आपल्या वेळी इंजिनीरिंग ची काय परिस्तिथी होती.  आपण किती अभ्यास करायचो! प्रत्येक गोष्ट यायलाच पाहिजे .हल्ली carry on ची फॅशन आली हो . नुसतं नावाला इंजिनिअर व्हायचं  . काही मुली तर चांगली स्थळ मिळण्यासाठी इंजिनिअर बनतात तर काही मुलं आई वडिलांनी घातलं म्हणूनच कॉलेजला येत आहे असे  बोलून आपल्यावरच उपकार करतात. हि मुलं बेधडक असं सांगतात शिक्षकांना याचंच आश्चर्य आहे.

त्यावर १ सर बोलले आपण आपले कर्तव्य करायचं ज्यांना शिकायचं आहे ते शिकतील. सर्वच अशी मुले नाहीत. काही जण त्यांना आयुष्यात काही तरी बनायचं आहे म्हणून येतात कॉलेजला. काही जणांची परिस्तिथी नाही अशी मुले शिष्यवृत्ती मिळवून शिकत आहेत.

मला तर वेडावल्या सारखं झालं. मी कॉलेज ला होते तेंव्हा आम्ही सुद्धा कंमेंट्स पास करायचो पण शिक्षकांना घाबरायचो देखील. शिक्षक-विद्यार्थ्यांचं नातं जपायचो. आता म्हणजे शिक्षक -विद्यार्थी खांद्यावर हात टाकून मित्र असल्या सारखे वागू लागले आहेत. असं १ का शिक्षकाने केलं तर त्याचे परिणाम स्रर्वांना भोगावे लागतात. त्यापेक्षा शिक्षक-विद्यार्थ्यांचं नातं maintain करा .
मला आता माझ्या शिक्षकाच्या अनुभव वरून १ गोष्ट चांगली समजली होती . तुम्हाला जर तुमच्या विषय मधील पूर्ण ज्ञान असेल आणि तुम्ही तुमच्या विषयासंबंधी सर्व शंकांचे निरसन व्यवस्तिथ करू शकत असाल तर मुलं तुमच्या तासाला गोंधळ घालत नाहीत किंवा कंमेंट्स पास करत नाहीत.

हे झालं शिकवण्या संबंधी पण १ पर्मनंट नसलेला शिक्षक याला त्या कॉलेजच्या राजकारणाला बळी पडाव लागत . तिथे सिनिअर -ज्युनिअर प्रकार असतो . ज्युनिअर लोकांनी सिनिअर शिक्षकांची कामे करायची . त्यात जर तुमचं कॉलेज असे  असेल तर तुमच्यावर कधी  राजकारण होऊन तुमची नोकरी जाईल याचा पत्ता लागायचा नाही. तुम्हाला सिनिअर शिक्षकानं पेक्षा जास्त विषय शिकवावे लागतात. तुम्हाला आवडेल तो विषय शिकवण्याची मुभा नसते. पगारच बोलायचं तर पर्मनंट शिक्षकाचा पगार लाखाच्या घरात आणि तोच ज्युनिअर पर्मनंट नसल्याचा हजाराच्या घरात . असो !!!!!

बहुतेक इंजिनीअरिंग ची मुलं हि मोठ्या घरची म्हणजे संपन्न कुटुंबातील असतात त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी कॉलेजला काही पैसे दान दिले असतील तर त्यांच्या मुलांच्या दादागिऱ्या शिक्षकाने सहन करायच्या. त्यांची कुवत नसताना त्यांना इंटर्नल मार्क्स जास्त द्यायचे. त्यांचे एक्सटेर्नल प्रॅक्टिकल्स सोडवायची असे प्रकार सुरु झाले आहेत.

असाच १ विद्यार्थी माझ्या वर्गात होता वर्ष भर कधीतरी तोंड दाखवायला यायचा पण त्याच्या आई-वडिलांनी कॉलेजला काही रक्कम दान दिली असल्या मुळे  माझ्या मनात नसताना त्याला पास करावं लागलं किती अन्याय आहे बाकीच्या मुलांवर हा ?
काही मुले तर इतकी उद्धट असतात कि सांगायला नको . सरळ बोलतात मॅडम चेक करता का नाही assignment नाही तर विभाग प्रमुखाला सांगतो . विभाग प्रमुख management  च्या नावाखाली त्यांच्यावरच पांघरून घालून मोकळे होतात. त्यात त्यांचा तरी काय दोष ? ऍडमिशन झाली नाहीत तर पगार कसे होणार? त्यामुळे  त्यांनाही तस वागणं भाग पडत.

पण या परिस्तिथीत मनापासून शिकवण्याची आस असून देखील दुर्लक्ष्य करावं लागत आणि त्या कळपातील मेंढ्यां प्रमाणे चालणं बंधनकारक होत. कारण जी २-४ मुलं  खरोखर शिकण्यासाठी येतात तीही शेवटच्या  वर्षात जाईपर्यंत सर्वां सारखीच उद्धट बनून जातात ,बदलून जातात . बाहेर एक्सट्रा क्लास जॉईन करत असल्यामुळे कॉलेज मध्ये शिकवण्यात लक्ष्य देत नाहीत . मग विद्यार्थ्यांना जर शिक्षकांची आणि शिकण्याची गरज नाही तर शिक्षक किती मागे फिरेल यांच्या?

म्हणून आज विद्यार्थी कस्टमर झाले आणि शिक्षक व्यावसायिक !!!!!

काही विद्यार्थी नापास झाले कि आत्महत्या सारखे प्रकार करतात त्यांच्या मुळे सरकारने अभ्यासक्रमात बदल केले, पास होण्यासाठी सोप्या पद्धती आणल्या आणि तेंव्हा पासुंन शिक्षणाची गुणवत्ता च कमी होऊन गेली.

आज प्रत्येक शिक्षक विचार करतो माझ्या शिकवण्याला जर किंमत मिळत नसेल तर मला माझा पगार मिळत आहे. मी कशाला इतका आटापिटा करून शिकवू ? विद्यार्थ्यांना आज शिक्षणाची गरज नाही त्यांना फक्त डिग्री ची गरज आहे. नाही का ?

आजच्या या परिस्तिथीला सरकार, शिक्षण पद्धती , बदलेल अभ्यासक्रम आणि पद्धत , शिक्षक , विद्यार्थी आणि पालक सर्व जबाबदार आहेत .


तुम्हीही तुमचे मत मला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा. 

धन्यवाद !